भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल सध्या आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्स संघाचा कर्णधार आहे. २०१८ मध्ये झालेल्या स्पर्धेत तो फलंदाज म्हणून संघात समाविष्ट झाला होता. त्यानंतर २ वर्षानंतर त्याला या संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. परंतु, त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्स संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. या हंगामात देखील पंजाब किंग्स संघाचे प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण दिसून येत आहे.
विराट कोहली टी-२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या जागी केएल राहुलला कर्णधार करा अशी मागणी जोर धरू लागली होती. परंतु, त्याची आयपीएल स्पर्धेतील कामगिरी पाहता माजी भारतीय क्रिकेटपटूने त्याला भारतीय संघाच्या कर्णधार पदासाठी अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा यांच्या मते केएल राहुलने गेल्या २ वर्षात अशी काहीच कामगिरी केली नाहीये, ज्यामुळे तो कर्णधार पदासाठी योग्य असेल.
क्रिकबजवर बोलताना अजय जडेजा यांनी म्हटले की, “केएल राहुल गेल्या २ वर्षांपासून या संघाचा कर्णधार आहे. परंतु, मला या २ वर्षात कधीच असे जाणवले नाही की, तो एक उत्तम ‘लीडर’ आहे. आज जो संघ खेळतोय, संघात जे बदल करण्यात आले आहेत, तुम्हाला काय वाटतं हे बदल केएल राहुलने केले आहेत? कोणीतरी भारतीय संघाचा कर्णधार बनतो तेव्हा त्याला विश्वास असतो की,तो संघाचा कर्णधार असावा. केएल राहुलमध्ये मी आजपर्यंत ते पाहिलं नाही.’
पण, याबरोबरच जडेजा यांनी असेही म्हटले की राहुलच्या शांत स्वभावामुळे त्याने नेतृत्व केले, तर तो त्यापदावर बराचकाळ टिकू शकतो. तो म्हणाले, ‘तो खूप मवाळ बोलणारा आहे आणि प्रत्येक गोष्टीशी जुळवून घेतो. जर तो एक दिवस कर्णधार झाला, तर तो सर्वात जास्त काळ टिकेल हे निश्चित आहे. कारण प्रत्येक गोष्टीत सुसंगत असलेली व्यक्ती दीर्घकाळ त्या पदावर राहू शकते.
तसेच केएल राहूलबाबत वक्तव्य करताना दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू डेल स्टेन याने म्हटले की, “जर आरसीबी दीर्घ काळासाठी एखाद्या खेळाडूला कर्णधार बनवण्याचा विचार करत आहे. तर तो आरसीबीचा माजी खेळाडू केएल राहुल असू शकतो. मला असे वाटते की, आगामी. हंगामात तो आरसीबीमध्ये पुनरागमन करेल आणि संघाचे नेतृत्व देखील करेल. माझ्या मते एबी डिविलियर्सला संघाचे कर्णधारपद देणे अयोग्य असेल. तो एक अप्रतिम खेळाडू आहे. परंतु हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा काळ आहे. माझ्या मते तो एक उत्तम लीडर आहे.” विराट चालू आयपीएल हंगामानंतर आरसीबीचे देखील कर्णधाप सोडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बाबो! काही तासांत विकली गेली भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकीटे
हैदराबादविरुद्ध अवघ्या १८ धावा करताच दिनेश कार्तिकच्या नावे झाली ‘या’ मोठ्या विक्रमाची नोंद
Video: मिताली राजला धोनीकडून शिकायचंय हे कौशल्य, दिवस-रात्र कसोटीनंतर व्यक्त केली इच्छा