भारतीय संघ गुरुवारी (10 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषक 2022 मधून बाहेर पडला. विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताचा सामना इंग्लंडसोबत झाला. इंगंल्डने हा सामना 10 विकेट्सने नावावर केला आणि अंतिम सामन्यात धडक घेतली. पराभवानंतर सर्वात जास्त प्रश्न कोणावर उपस्थित होत असतील, तर तो आहे कर्णधार रोहित शर्मा. भारताचे माजी दिग्गज अजय जडेजा यांनीही रोहितवर निशाणा साधला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा उपांत्य सामना एडिलेड ओव्हल याठिकाणी पार पडला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक गमावल्यानंतर संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. मर्यादित 20 षटकांमध्ये भारताने 6 विकेट्सच्या नुकसानावर 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने हे लक्ष्य अवघड वाटत होते, पण त्यांनी एकही विकेट न गमावता विजय मिळवला. इंग्लंडच्या डावाची सुरुवात करायला आलेला कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आणि ऍलेक्स हेल्स (Alex Hales) यांनी अनुक्रमे 80 आणि 86 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
पराभवानंतर भारतीय संघ टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. रोहित शर्मावर सर्वात जास्त टीका होताना दिसते. माजी दिग्गज फलंदाज अजय जडेजा (Ajay Jadeja) देखील रोहित आणि संघ व्यवस्थापनावर नाराज आहेत. जडेजाच्या मते भारतीय संघाने यावर्षी अनेक खेळाडूंच्या नेतृत्वात मालिका खेळल्या आहेत आणि याच गोष्टीचा तोटा संघाला टी-20 विश्वचषकात झाल्याचा दिसतो. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “घरात एक वडीलधारी व्यक्ती हवी असते, सात वडीलधाऱ्या व्यक्ती असल्यावर कसे चालणार.”
जडेजा पुढे बोलताना म्हणाले की, “मी एक गोष्ट बोलेल, जी थोडी टोचण्यासारखी आहे. जर एखाद्या कर्णधाराला संघ बनवायचा आहे, तर त्याला पूर्ण वर्ष संघासोबत रहावे लागते. या संपूर्ण वर्षात रोहितने किती दौरे केले? ही गोष्ट मी आधीही बोलून दाखवली आहे. तुम्ही संघ बनवला आहे आणि तुम्ही सोबतच नसाल, तर हे ठीक नाहीये.”
दरम्यान, भारतीय संघाने मागच्या एका वर्षात एक – दोन नाही, तर तब्बल सात कर्णधारांच्या नेतृत्वात खेळण्याचा पराक्रम केला आहे. वर्षाच्या सुरुवातील विराट कोहली भारताचा कर्णधार होता. त्यानंतर ही जबाबदारी रोहित शर्माकडे आली. त्यानंतर रोहित अनेक मालिकांमध्ये विश्रांतीवर असल्यामुळे केएल राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांनी संघाचे नेतृत्व केल्याचे पाहिले गेले. जडेजांच्या मते याच कारणास्तव रोहितला संघाचा पुरेसा अंदाज आलेला नसावा आणि उपांत्य सामन्यासारख्या महत्वाच्या लढतीत संघ 10 धावांनी पराभूत झाला. दरम्यान, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामना रविवारी (13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. (ajay jadeja slams rohit sharma after india defeated by england in t20 world cup semifinal)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सेमीफायनलमध्ये हारल्यानंतर विराट अन् पंड्याचं तुटलं हृदय! ‘हा’ फोटो तुम्हालाही करेल भावूक
आयर्लंडकडून पराभव ते अंतिम सामना, इंग्लंडच्या पुनरागमनावर जोस बटलरची खास प्रतिक्रिया