विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये खेळला जात आहे. या स्पर्धेत पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटचा किंग कोण होणार हे अजूनही स्पष्ट झाले नाहीये. या मोठ्या सामन्यानंतर, भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेपूर्वी माजी इंग्लिश क्रिकेटपटूने भाष्य केले आहे.
इंग्लंड संघासाठी १६२ कसोटी सामने खेळलेल्या दिग्गज फलंदाज, ॲलेस्टर कूकने म्हटले आहे की, “भारतीय संघाने दाखवून दिले आहे की, तो किती मजबूत संघ आहे. कारण ते आता विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळत आहेत. तरीदेखील त्यांना इंग्लंड संघाला इंग्लंडमध्ये पराभूत करणे एक आव्हान असणार आहे. ही एक कठीण मालिका असणार आहे. भारतीय संघ खूप वेळ इंग्लंडमध्ये थांबणार आहे. त्यांना मानसिकदृष्ट्या थकवा जाणवू शकतो. भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळेल, परंतु ती सुरुवात टिकवून ठेवणे कठीण असणार आहे. माझ्या मते, इंग्लंड संघाने सुरुवातीपासून संयम बाळगला तर ते या मालिकेत विजय मिळवू शकतात.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “चुकीच्या रोटेशन पॉलिसीचा फटका इंग्लंड संघाला बसला आहे. ज्यामुळे कर्णधार जो रूटला न्यूझीलंड विरुद्ध आपली प्लेइंग इलेव्हन निवडता आली नाही. जो रूटला अजूनही आपले सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडता आले नाही. बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो सारखे खेळाडू कधीही सामना जिंकून देऊ शकतात. जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स दुखापतग्रस्त होते. तर बटलर, बेअरस्टो, क्रिस वोक्स, मोईन अली आणि मार्क वुड यांना विश्रांती दिली गेली होती.(Alastair Cook said, it will not easy to beat England in England)
इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक:
१) पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
२) दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
३) तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
४) चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
५) पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्वाच्या बातम्या –
आठवणीतील सामना: दोन वर्षांपूर्वी शमीने हॅट्रिक घेत संपविला होता ३२ वर्षाचा दुष्काळ
पाकिस्तान संघाला जबर धक्का, टी२० विश्वचषक २०२२पर्यंत करारबद्ध असलेल्या प्रशिक्षकाने घेतली माघार
शुभमनने सांगितला विराटसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा, ‘या’ कारणामुळे होऊ शकलं नाही बोलण