भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना तिरुअनंतपुरम येथे खेळला गेला. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीवर सूर्यकुमार यादव व केएल राहुल यांनी कळस चढवत भारतीय संघाला आठ गड्यांनी विजय मिळवून दिला. भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा सामन्याचा मानकरी ठरला. त्याने आपल्या पहिल्या षटकात तीन गडी बाद करत सामन्यात भारताला बरेच पुढे नेऊन ठेवले होते. अगदी 20 दिवसांपूर्वी ज्या अर्शदीपवर टीकेचा भडीमार झाला होता, तोच अर्शदीप भारताच्या विजयाचा नायक ठरला.
याच महिन्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळली केली होती. त्यातील सुपर फोरच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय संघाला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. सामना भारताच्या हातात असताना अर्शदीपने पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली याचा सोपा झेल सोडलेला. त्यानंतर अली याने सामना जिंकून देणारी कामगिरी केली. त्यावेळी अर्शदीपवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. अनेकांनी त्याला देशद्रोही देखील म्हटलेले. तसेच त्याला संघातून काढण्याची मागणी केलेली.
त्यानंतर जवळपास 24 दिवसांनी आता अर्शदीप दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय विजयाचा नायक बनला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेला मुकल्यानंतर त्याने या सामन्यातून पुनरागमन केले. सामन्यातील दुसरे व वैयक्तिक पहिले षटक टाकताना त्याने दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी सलामीवीर क्विंटन डी कॉक, रायली रुसो आणि डेव्हिड मिलर या तीनही अनुभवी फलंदाजांना बाद केले. त्यानंतर हे त्याने अशीच भेदक गोलंदाजी केली. आपल्या 4 षटकात त्याने 32 धावा देत तीन गडी बाद केले. याच कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
महत्वाच्या बातम्या –
चहर-अर्शमूळे दक्षिण आफ्रिका फर्शवर! सर्व प्रकारच्या टी20 मधील सर्वात लाजिरवाणी कामगिरी केली नावावर
विराट-रोहितमध्ये लागलीये महानतेची रेस! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोघांतच रंगणार ‘रनसंग्राम’