---Advertisement---

अश्विनने भारतीय गोलंदाजांच्या ‘या’ नाईलाजावर उपस्थित केले प्रश्न; म्हणाला- ‘आशा करतो की टी20 वर्ल्ड कपमध्ये….’

On: शनिवार, जानेवारी 24, 2026 7:54 PM
---Advertisement---

रविचंद्रन अश्विनने 23 जानेवारी 2026 रोजी रायपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताच्या निर्भीड फलंदाजीचे भरभरून कौतुक केले. मात्र, टीम इंडियाच्या या माजी फिरकी अष्टपैलू खेळाडूचे असेही मत होते की, दुसऱ्या डावात पडलेल्या ओसमुळे गोलंदाजांसाठी हा सामना अन्यायकारक ठरला.

अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले की, ‘सामने दुपारी सुद्धा खेळवले जाऊ शकतात. न्यूझीलंडसारख्या संघांना त्याने काही फरक पडणार नाही, कारण त्यांच्याकडे जास्त गोलंदाज नाहीत आणि त्यांना माहित आहे की अशा परिस्थितीत काहीही करता येत नाही. पण भारतासारख्या संघात जर एखादा खेळाडू दोन सामन्यांत चांगली कामगिरी करू शकला नाही आणि तिसऱ्या सामन्यात अशा कठीण परिस्थितीत गोलंदाजी करताना त्याने धावा दिल्या, तर त्याचे करिअर धोक्यात येऊ शकते. अशा परिस्थितीत खेळणे अनफेअर आहे.’

अश्विन पुढे म्हणाला की, ‘एक गोलंदाज म्हणून तुम्ही अशा परिस्थितीचा सामना कसा करणार? आपण अधिक चांगले नियोजन करू शकतो. जर ओस पडणार असेल, तर किमान सामने दिवसा तरी खेळा किंवा मग ठिकाणांची निवड वेगळ्या पद्धतीने करा. इतर देशांकडे प्रत्येक मैदानाचा रेकॉर्ड, विकेट कशी खेळते, सरासरी धावसंख्या किती असावी, याची सर्व माहिती असते. आपल्याकडेही असा रेकॉर्ड असायला हवा.’

अश्विनने अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की टी20 वर्ल्ड कप 2026 वर ओसचा परिणाम होऊ नये. तो म्हणाला, ‘मला मनापासून आशा आहे की टी20 वर्ल्ड कपच्या भारतातील सामन्यांवर ओसचा प्रभाव पडणार नाही. जर तसे झाले, तर कौशल्याचे महत्त्व कमी होईल. या मैदानांवरील ओसच्या घटकाबाबत थोडी अधिक खबरदारी घेतली जाईल, अशी मला आशा आहे. एकदा का ओस पडली की, तुम्हाला पूर्णपणे नाणेफेकीवर (Toss) अवलंबून राहावे लागते. मला असे वाटत नाही की एखाद्या बहुराष्ट्रीय विश्वचषकाचा निकाल ओसमुळे ठरावा. कौशल्यालाच महत्त्व मिळाले पाहिजे.’

या चिंतेवर बोलताना अश्विन भारताचे मॅच विनर ईशान किशन (32 चेंडूत 76 धावा) आणि सूर्यकुमार यादव (37 चेंडूत नाबाद 82 धावा) यांचे कौतुक करायला विसरला नाही. त्याने कुलदीप यादवचेही कौतुक केले की चेंडू ओला असतानाही त्याने 2 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाच्या विजयावर आनंद व्यक्त करतानाच अश्विनने एका गोष्टीवर जोर दिला की, ‘ओस खेळाचे सौंदर्य नष्ट करू शकते.’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---