भारतीय क्रिकेट चाहत्यांपैकी अनेकांनी सीके नायडू, लाला अमरनाथ या दिग्गजांचे नाव तर नक्कीच ऐकले असेल. परंतु बका जिलानी या दिग्गजाचे नाव केवळ हातावर मोजता येतील इतक्या लोकांनाच ठाऊक असेल. अनेक चाहत्यांना हे नाव माहीत नसण्यामागील कारण म्हणजे, एका अपघातात जिलानी यांनी या जगाचा निरोप घेतला होता. २० जुलै १९११ रोजी जालंधर मध्ये जन्मलेल्या जिलानी आपल्या ३० व्या वाढदिवसाच्या १८ दिवसांपूर्वीच जगाचा निरोप घेतला होता. आज (२० जुलै) जिलानी यांची १०९ वी जयंती आहे.
जिलानी (Baqa Jilani) यांनी भारतीय संघाकडून १९३६ साली द ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध आपला एकमेव आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता. त्यात त्यांनी १६ धावा केल्या होत्या. याव्यतिरिक्त त्यांनी ३१ प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यात त्यांनी १८.५६ च्या सरासरीने ९२८ धावा केल्या. यामध्ये त्यांनी सर्वोत्तम धावसंख्या ही ११३ ही आहे. त्याचबरोबर गोलंदाजी करताना १९.९३ च्या सरासरीने ८३ विकेट्स घेतल्या. गोलंदाजी करताना त्यांची सर्वोत्तम कामगिरी ही ७/३७ इतकी आहे. विशेष म्हणजे जिलानी हे भारतीय इतिहासात रणजी ट्रॉफीमध्ये हॅट्रिक घेणारे पहिले गोलंदाज आहेत.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जबरदस्त पदार्पण
जिलानी यांनी आपल्या पदार्पणाच्या प्रथम श्रेणी सामन्यात १२ विकेट्स घेतल्या आहेत. त्यांनी १९३४-३५ मध्ये उत्तर भारताकडून खेळताना दक्षिण पंजाबविरुद्ध पहिल्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात हॅट्रिक घेतली होती. पंजाब संघ २२ धावांवर संपुष्टात आला होता. आणि कोणत्याही संघाचा सर्वात कमी धावसंख्येचा हा विक्रम जवळपास ७६ वर्षे राहिला होता.
१९४१ मध्ये जिलानी यांच्या वाढदिवसाच्या केवळ १८ दिवसांपूर्वीच त्यांच्या मृत्यूच्या घटनेने प्रत्येकालाच मोठा धक्का बसला होता. केवळ २९ वर्षांच्या वयात जिलानी यांनी जगाचा निरोप घेतला होता. असे म्हटले जाते की त्यांना फीट (एकप्रकारे चक्कर) आल्यामुळे त्यांचे नियंत्रण सुटले आणि ते आपल्या बालकनीमधून खाली पडले होते. ते अमर सिंग यांच्यानंतर सर्वात कमी वयात मृत्यू पावणारे भारतीय संघाचे दुसरे क्रिकेटपटू होते. अमर सिंग (Amar Singh) यांनी २१ मे १९४० रोजी जगाचा निरोप घेतला होता. तरीही जिलानी यांच्याबद्दल असेही म्हटले जाते की त्यांना डिप्रेशनचा त्रास होता. आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-दुर्दैवचं म्हणा! या खेळाडूंच्या नशिबात कधीही आला नाही आयसीसीच्या स्पर्धातील सामनावीर पुरस्कार
-भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
-विक्रम जरी मोडण्यासाठी असले तरी हे ३ विक्रम मोडणे केवळ अशक्य