इमर्जिंग एशिया कप 2023 चा अंतिम सामना भारत अ आणि पाकिस्तान अ संघात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानच्या अनुभवी संघाने भारतीय संघावर एकतर्फी वर्चस्व गाजवताना 128 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र, त्याचवेळी भारतीय संघाच्या फलंदाजी दरम्यान पंचांनी केलेल्या दोन मोठ्या चुकांचा तोटा भारतीय संघाला सहन करावा लागला. त्यावर सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते.
पाकिस्तान सामन्यात शानदार फलंदाजी करताना 352 धावा उभ्या केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघासाठी साई सुदर्शन व अभिषेक शर्मा यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी केवळ 8.3 षटकात 64 धावांची सलामी दिली. त्याचवेळी भारतीय डावातील नवव्या षटकात अर्शद इक्बाल गोलंदाजी करत असताना साई सुदर्शन याने उंचावरून फटका मारण्याच्या नादात यष्टीरक्षकाच्या हाती झेल दिला. मात्र, रिप्लेमध्ये इक्बाल याने हा चेंडू नो बॉल पद्धतीचा टाकल्याचे वाटत होते. मात्र, तिसऱ्या पंचांनी पाकिस्तानच्या बाजूने निर्णय देत साई सुदर्शन याला बाद ठरवले.
त्यानंतर भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज निकिन जोस हा देखील मोहम्मद वसीम जुनियर याच्या गोलंदाजीवर संशयास्पदरित्या बाद झाला. वसीम याचा चेंडू निकीनच्या थायपॅडला लागून यष्टीरक्षकाकडे गेल्याचे स्पष्ट दिसत असताना, पंचांनी त्याला बाद ठरवले. तेव्हा निकीन याने मैदाना बाहेर जाताना उघड नाराजी व्यक्त केली.
(Bad Umpiring Affect Team India Win In Emerging Asia Cup Final Against Pakistan A)
आणखी वाचा:
त्रिनिदादमध्ये सिराजचा कहर! पाच बळींनी यजमानांना 255 वर गुंडाळले, भारताकडे 183 धावांची आघाडी
सात्विक-चिरागचे कोरिया ओपनवर ‘राज’! पुरूष दुहेरीचे विजेतेपद केले नावे