इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. त्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल कमिटीने तत्काळ बैठक घेत आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. आता या स्पर्धेतील उर्वरित सामने बीसीसीआयने युएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी इंग्लंडचे खेळाडू आयपीएल खेळणार नसल्याचे म्हटले गेले होते आता आणखी एका देशातील खेळाडूंनी आयपीएल खेळण्यास नकार दिला आहे.
बीसीसीआयने २९ मे रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये आयपीएल स्पर्धा पुन्हा खेळवण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचे उर्वरित सामने यूएईमध्ये खेळवले जाणार आहेत. यापूर्वी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने म्हटले होते की, इंग्लंडचे खेळाडू आयपीएल स्पर्धेत सहभाग घेऊ शकणार नाहीये. आता बांगलादेश क्रिकेट बोर्डने देखील आपले खेळाडू आयपीएल स्पर्धा खेळणार नसल्याचे म्हटले आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष, नजमूल हसन यांनी म्हटले की, “शाकिब अल हसन आणि मुस्तफिजुर रहमान यांना ना हरकर प्रमाणपत्र आता मिळणे शक्य नाही. टी-२० विश्वचषक येणार आहे आणि हे सामने आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत. त्यांना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघासोबत सामने खेळायचे आहेत. त्यानंतर बांगलादेश संघाला न्यूझीलंडचा दौरा देखील करायचा आहे.”
ईसीबी क्रिकेट बोर्डाचे डायरेक्टर एश्ले जाइल्स हे यापूर्वीच म्हणाले होते की, “आम्हाला आता कार्यक्रम निश्चित करायचा आहे. त्यामुळे, ॲशेस आणि टी -२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी खेळाडूंना फॉर्ममध्ये आणणे आवश्यक आहे. आयपीएलसाठी इंग्लंडचा एकही खेळाडू मुक्त केला जाणार नाही”
परदेशी खेळाडूंशिवाय स्पर्धेचे आयोजन
राजीव शुक्ला म्हणाले की, “आम्ही परदेशी खेळाडूंसोबत चर्चा करत आहोत. आमचे पूर्ण लक्ष आयपीएल स्पर्धा खेळवण्यावर आहे. हे मध्येच सोडता येणार नाही. जे खेळाडू उपलब्ध आहे ते ठीक आहे. जे उलबध नाही तरीही ठीक आहे. याने आमच्या आयोजनावर कुठलाही परिणाम होणार नाही. आम्ही परदेशी खेळाडूंशिवाय आयपीएल स्पर्धेचे आयोजन करू.”
ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
उर्वरित आयपीएल २०२१ हंगामावेळी ऑस्ट्रेलियन संघ बांगलादेशचा दौरा करणार आहे. इथे त्यांना ५ टी -२० सामने खेळायला मिळू शकतात. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला वेस्ट इंडिजचा दौरा करायचा आहे. त्यानंतर अफगाणिस्तान संघाविरुद्ध मालिका आणि ॲशेस मालिका देखील आहे. त्यामुळे त्यांच्याखेळाडूंना आयपीएल खेळण्याची परवानगी मिळणार का, हे पाहावे लागेल.
यासोबतच येत्या २८ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर रोजी सीपीएलचे २०२१ चे सामने खेळवण्यात येणार आहेत. बीसीसीआय हे सामने १० दिवस आधी संपवण्यासाठी वेस्ट इंडिज बोर्डासोबत चर्चा करणार आहे. जर आयपीएल स्पर्धा खेळवता आली नाहीतर, बीसीसाआयला २५०० कोटींचे नुकसान होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
आता लक्ष्य टेस्ट चॅम्पियनशीप! भारतीय संघ क्वारंटाईनदरम्यान देखील घेतोय प्रचंड मेहनत, व्हिडिओ व्हायरल
WTC Final: ‘या’ कारणामुळे न्यूझीलंड भारतीय संघाला ठरु शकतो वरचढ, माजी भारतीय कर्णधाराने मांडले मत
‘हा’ ट्विटरकर्ता गेल्या १० वर्षांपासून विराट कोहलीला देतोय त्रास; काय आहे नेमकं कारण, घ्या जाणून