इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना बुधवारपासून (२५ ऑगस्ट) लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहली विरुद्ध जेम्स अँडरसन असा सामना रंगलेला दिसला. अँडरसनने विराटला ७ धावांवर बाद केले. विशेष म्हणजे, पहिल्या कसोटीपासून खेळाडूंमध्ये वाद झालेले पाहायला मिळाले आहे. तसेच तिसऱ्या कसोटीपूर्वीच अँडरसनने विराटसोबत शाब्दिक युद्ध सुरू केले होते.
पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर या मालिकेत विराटची सरासरी केवळ २०. ६६ होती. विराटने पहिल्या २ कसोटीतील तीन डावांमध्ये फलंदाजी केली आहे आणि त्याला अर्धशतकही करता आले नाही. पहिल्या कसोटीत गोल्डन डकवर बाद झालेल्या विराटने दुसऱ्या कसोटीत ४२ आणि २० धावा केल्या. चांगली सुरुवात असून देखील विराट बाहेरील चेंडूवर आपली विकेट गमावत आहे.
यूके टेलिग्राफशी संभाषणादरम्यान अँडरसन विराटबद्दल म्हणाला, “क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या संपर्कात येतात. मी त्याच्या (विराट) पेक्षा जास्त प्रतिस्पर्धी असलेल्या काही लोकांविरुद्ध गोलंदाजी केली आहे आणि मी त्यांच्याशी देखील सामना केला आहे. त्यामुळे माझे लक्ष क्रिकेटवर आहे, इकडे -तिकडे होणाऱ्या गोंधळावर नाही.”
अँडरसन पुढे म्हणाला की, “आम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की, विराटची सरासरी या मालिकेत २० आहे, जे हे सिद्ध करते की, आम्ही जागतिक दर्जाच्या फलंदाजाविरुद्ध चांगली गोलंदाजी केली आहे. पण, जर त्याची सरासरी ८० केली असती आणि आम्ही मालिकेत १-० वर असतो, तर मला आनंद झाला असता.”
इंग्लंड आणि भारत यांच्यातील नॉटिंघममध्ये झालेला पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. तर लॉर्ड्स कसोटी भारताने १५१ धावांनी जिंकली आणि सध्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘आता तू सुद्धा सुरु झालास का?’; गोलंदाजांच्या नो बॉलला कंटाळून कर्णधार आझमची मजेशीर रिऍक्शन
लाॅर्ड्सचे हिरो हेडिंग्लेवर ठरले ‘झिरो’..! भारताचे ‘हे’ दोघे खेळाडू भोपळाही न फोडता तंबूत माघारी
त्याला स्वत:च्या रंगात रंगलेले पाहून आनंद झाला, तो डोळ्यांत डोळे घालून खेळणारा गोलंदाज – विराट कोहली