भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका सध्या खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांपैकी आफ्रिकी संघाने दोन, तर भारताने एक सामना जिंकला. अशात बीसीसीआयने बुधवारी (१५ जून) आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ घोषित केला. अष्टपैलू हार्दिक पंड्या या संघाचा कर्णधार आहे आणि संघात वेगवान गोलंदाजांची भरमार आहे.
आयर्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाला पहिला सामना २६ जून रोजी खेळायचा आहे, तर दुसरा सामना २८ जूनला खेळायचा आहे. कर्णधार हांर्दिक पंड्याच्या जोडीला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar) उपकर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. भारताच्या वरिष्ठ खेळाडूंचा संघ या काळात इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत निवडर्त्यांनी युवा खेळाडूंना संधी दिली आहे. संघात अनेक गुणवंत वेगवान गोलंदाज सहभागी केले गेले आहेत.
हर्षल पटेल (Harshal Patel), आवेश खान (Aawesh Khan), अर्शदीप सिंग (Arshdeep Singh), उमरान मलिक (Umran Malik) आणि स्वतः उपकर्णधार भुवनेश्वर कुमार यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत निवडले गेले होते. आता या पाचही वेगवान गोलंदाजांना आयर्लंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी संघात कायम ठेवले गेले आहे. आफ्रिकी संघाविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये पाच गोलंदाजांपैकी हर्षल, आवेश आणि भुवनेश्वर या तिघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली. पण अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांना अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली नाहीये.
भुवनेश्वर कुमारने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात अवघ्या १३ धावा खर्च करून चार महत्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. तर मालिकेतील पहिल्या सामन्यात आवेश खानच्या एका वेगवान चेंडूवर रस्सी व्हॅन डर दुसेन याची बॅट तोडली होती. आवेशने टाकेलला चेंडू एवढा वेगवान होता की, बॅटचे मधून दोन तुकडे झाले होते. हर्षल पटेल देखील काही कमी नाही. त्याने मालिकेतील तिसऱ्या सामन्यात २५ धावा खर्च करून ४ महत्वाच्या विकेट्स घेतल्या आणि आफ्रिकी संघाला पराभवाची धूळ चारली.
अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांना आफ्रिकी संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता होती, पण त्यांना अद्याप ती संधी मिळाली नाहीये. आफ्रिकेविरुद्धच्या पुढच्या दोन्ही सामन्यांमध्ये जर या युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली नाही, तर आयर्लंडविरुद्ध संघ व्यवस्थापन त्यांना आजमावण्याचा विचार नक्कीच करू शकतो. अर्शदीप सिंग शेवटच्या षटकांमध्ये संघासाठी किफायतशीर गोलंदाजी करू शखतो, तर उमरान त्याच्या गतीसाठी ओळखला जात आहे. उमरानने आयपीएल २०२२ मध्ये १५७ किमी ताशी गतीने चेंडू टाकला होता, जो हंगामातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू ठरलेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
तिच्या सम तीच! भारतीय चाहत्यांना आठवणींचं भांडार देऊन मितालीनं इंटरनॅशनल क्रिकेटला म्हटले, ‘अलविदा!’
आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही टी२० सामन्यात फिक्स सलामीला उतरणार ‘हे’ दोन खेळाडू
फॉर्मात नसलेल्या रोहित-विराटचं पुढे काय होणार, टी२० विश्वचषकातून डच्चू मिळेल का?