भारतीय संघ सध्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे. त्यामुळेच संघात खेळाडूंची ये-जा सुरू आहे. टेस्ट संघाचा कर्णधार शुबमन गिलने इंग्लंडमध्ये बॅटने धुमाकूळ घातला. त्यामुळेच आता त्याच्या टी20I संघात पुनरागमनाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, सध्या कर्णधार गिल टी20I संघात फिट बसत नाहीये. टेस्ट क्रिकेटमध्ये शुबमन गिलचे वजन जरी वाढलं असलं, तरी टी20I संघात सध्या अनेक मॅच विनर खेळाडू आहेत, ज्यांना संघाबाहेर करणे चुकीचे ठरेल.
एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफीत 754 धावा करणाऱ्या शुबमन गिलला टी20I संघात सध्या जागा मिळत नाहीये. आतापर्यंत गिलने टी20I फॉर्मेटमध्ये 21 सामने खेळले असून, त्यात त्याने 30.42 च्या सरासरीने 578 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 139.27 चा आहे. जर गिल या फॉर्मेटमध्ये परततो, तर तो अभिषेक शर्माच्या जागी संघात येईल. पण सध्या अभिषेक शर्मा छोट्या फॉर्मेटमध्ये आपली जागा पक्की करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
सध्या अभिषेक शर्मा नंबर 1 टी20I फलंदाज आहेत. त्यांनी 17 टी20I सामन्यांतील 16 डावांत 33.43 च्या सरासरीने 535 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 193.84 इतका आहे. दुसऱ्या सलामी फलंदाजाच्या भूमिकेत सध्या संजू सॅमसन खेळतो आहे. त्यामुळेच संघाला दुसरा विकेटकीपर फलंदाज संघात घ्यावा लागेल, आणि याच कारणामुळे तिथेही गिल फिट बसत नाहीये.
सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये कर्णधार सूर्यकुमार यादव नंबर 4 वर खेळत आहेत. तर नंबर 5 ची जागा हार्दिक पांड्याची नक्की आहे. नंबर 6 वर शिवम दुबे ठामपणे आपली उपस्थिती दाखवत आहेत. नंबर 7 वर रिंकू सिंग खेळतो आहे. अशा स्थितीत नंबर 3 वर तिलक वर्मा खेळत आहे. तिलक वर्माने 25 टी20I सामन्यांत 49.93 च्या अप्रतिम सरासरीने 749 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 155.07 इतका आहे. तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांच्याबरोबर टॉप 3 मध्ये एक विकेटकीपर खेळवणंही आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जर भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने शुबमन गिलला तरीही प्लेइंग 11 मध्ये बसवण्याचा प्रयत्न केला, तर संघाचं बॅलन्स बिघडण्याची शक्यता आहे.






