आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेचे वेळापत्रकही तयार केले आहे. पीसीबीने 1 मार्च रोजी लाहोरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना निश्चित केला आहे. मात्र, पीसीबीच्या या शेड्यूलला ना आयसीसीने ग्रीन सिग्नल दिलेला आहे ना बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या अनेक दिग्गज खेळाडूंनीही भारताला आपला संघ पाठवण्याची विनंती केली होती. दरम्यान, भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. वास्तविक, हरभजन सिंगने पाकिस्तानच्या लाईव्ह शोमध्ये आपला राग काढला. भज्जीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एका पाकिस्तानी वाहिनीवरील लाईव्ह शोमध्ये हरभजन सिंग म्हणाला, “जर आमचे खेळाडू पाकिस्तानात सुरक्षित नसतील तर आम्ही आमचा संघ पाठवणार नाही. तुम्हाला खेळायचे असेल तर खेळा, जर तुम्हाला खेळायचे नसेल तर खेळू नका. पाकिस्तानशिवायही भारतीय क्रिकेट टिकू शकते. जर तुम्ही भारतीय क्रिकेटशिवाय जगू शकत असाल तर ते करा.”
Harbhajan Singh said, “If our players are not safe in Pakistan, we won’t send the team. If you want to play, play; if not, don’t. Indian cricket can still survive without Pakistan. If you guys can survive without Indian cricket, then do it.” pic.twitter.com/tJaywUqUQV
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) July 13, 2024
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने दुबई किंवा श्रीलंकेत खेळू शकते. एएनआयच्या वृत्तानुसार, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही. त्यांचे सामने दुबई किंवा श्रीलंकेत आयोजित करण्यासाठी बीसीसीआय आयसीसीशी चर्चा करेल. मात्र, बीसीसीआयने अद्याप याबाबत अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.
तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की पाकिस्तान क्रिकेट बोर्डने 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वेळापत्रक तयार केले आहे. पीसीबीच्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत एकदिवसीय स्वरूपात खेळवली जाईल. पीसीबीने या स्पर्धेसाठी आपला मसुदा आधीच सादर केला आहे, ज्यामध्ये लाहोरमध्ये 7 सामने, रावळपिंडीमध्ये 5 आणि कराचीमध्ये 3 सामने होणार होते. पीसीबीने आपल्या वेळापत्रकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 1 मार्च रोजी लाहोरमध्ये होणारा सामना निश्चित केला आहे.
महत्तवाच्या बातम्या-
असा खेळाडू पुन्हा होणे नाही; युवराज सिंगने क्रिकेट करिअरमध्ये जिंकल्या चक्क इतक्या ट्राॅफ्या! एकदा पाहाच
दादा यावेळी थेटच म्हणाले, “भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे….”
ठरलं! ऑस्ट्रेलियाचा दिग्गज दिसणार नव्या टीममध्ये, यासंघांसोबत रिकी पाँटिंगची लागणार वर्णी?