भारतीय संघाने विश्वचषकात आपली विजयी घोडदौड कायम ठेवली असून विश्वविजेता बनण्यासाठी ते फक्त दोन पावले मागे आहेत. शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला मात देत टीम इंडिया उपांत्य फेरी गाढले. आता या फेरीत भारताचा सामना 27 जून रोजी गयाना येथे इंग्लंडशी होणार आहे. भारतीय संघाने येथे आतापर्यंत 3 टी20 सामने खेळले आहेत. टीम इंडियाचे आकडे उत्कृष्ट आहेत आणि 27 जून रोजी नशीबही टीम इंडियावर मेहरबान असल्याचे दिसते कारण पावसामुळे सामना खराब होण्यची शक्यता आहे.
टीम इंडियाने 2024 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत सहा विजय मिळवले आहेत. साखळी फेरीत भारतीय संघाने 3 सामने जिंकून सुपर-8 मध्ये स्थान मिळवले. यानंतर, या फेरीत रोहित आणि कंपनीने अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांना पराभूत केले. आता रोहित शर्माच्या संघाला उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीतही विजयाची मालिका कायम ठेवायची आहे. त्याआधी, गयाना येथे होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी भारतीय संघाची आकडेवारी जाणून घेऊया.
टीम इंडियाने या मैदानावर एकूण 3 टी-20 सामने खेळले आहेत, त्यापैकी 2 वेळा भारतीय संघ जिंकला आहे. एका सामन्यात संघाला वेस्ट इंडिजकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघाने 2019 मध्ये या मैदानावर पहिला टी20 सामना खेळला आणि शानदार विजयाची नोंद केली. या सामन्यात भारताने यजमान वेस्ट इंडिजचा 5 विकेटने पराभव केला. गेल्या वर्षी भारताने वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन टी20 सामने खेळले होते. वेस्ट इंडिजने एका सामन्यात भारताचा 2 गडी राखून पराभव केला होता, तर पुढच्या सामन्यात टीम इंडियाने यजमानांचा 7 गडी राखून पराभव केला होता.
या मैदानावरुन इंग्लंड संघासाठी मात्र वाईट बातमी आहे. आतापर्यंत इंग्लंडने येथे एकच सामना खेळला आहे ज्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. टी20 विश्वचषक 2024 मध्येही इंग्लंड संघाने बाजी मारत उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र, उपांत्य फेरीत गेल्या विश्वचषकाचा विजेता संघ अंतिम फेरीसाठी संपूर्ण मास्टर प्लॅन घेऊन बसणार आहे. मात्र पावसामुळे हा सामना खराब होण्याची भीती आहे.
टीम इंडियाचे फायनलचे तिकीट पक्के झाल्याचे दिसत आहे. 27 जून रोजी गयानामध्ये सुमारे 89 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे परंतु दुसऱ्यासाठी नाही. अशा परिस्थितीत 27 जून रोजी होणारा भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना रद्द झाल्यास टीम इंडिया थेट अंतिम फेरीत प्रवेश करु शकते.
महत्तवाच्या बातम्या-
‘भारतीयांनी चेंडूसोबत छेडछाड केलीय’, अर्शदीप सिंगवर गंभीर आरोप
भारतानं ऑस्ट्रेलियाला चारली धूळ, आता नंबर इग्लंडचा!
अफगाणिस्तानची सेमीफायनलमध्ये धडक, तालिबानने मानले भारताचे आभार…!!!