भारतात क्रिकेटची क्रेझ शिगेला पोहोचेल जेव्हा टीम इंडिया एकाच वेळी दोन सामने खेळेल. तुम्ही विचार करत असाल, हे कसं होईल? हो हे शक्य आहे. कारण 9 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया एकावेळी दोन वेगवेगळे सामने खेळणार आहे. जे की एका बाजूला पुरुषांचा संघ धडाकेबाज खेळी करेल तर दुसरीकडे महिलांचा संघ शानदार खेळी करेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना 9 ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार आहे. तर दुसरीकडे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया दुबईत महिला टी20 विश्वचषक खेळत आहे. महिला संघाचा पुढील सामनाही 9 ऑक्टोबरला आहे.
आता तुमच्या मनात असेच चालले असेल की भारताच्या शेवटच्या सामन्यातही हे घडले होते जेव्हा पुरुष संघ बांग्लादेश आणि महिला संघाचा सामना पाकिस्तानशी झाला होता. पण त्यावेळी दोन्ही सामन्यांची वेळ वेगळी होती. महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुपारी 3.30 वाजता खेळवण्यात आला, तर भारत विरुद्ध बांग्लादेश सामना 7 वाजता सुरू झाला.
पण 9 ऑक्टोबर रोजी पुरुष आणि महिला संघाचे सामने जवळपास एकाच वेळी होणार आहेत. भारतीय पुरुष संघ 9 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता बांग्लादेशविरुद्ध खेळणार आहे. महिला टी20 विश्वचषकात भारताचा श्रीलंकेसोबतचा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. दोन्ही सामन्यांमध्ये केवळ अर्ध्या तासाचा फरक आहे. अशा परिस्थितीत 9 ऑक्टोबर हा दिवस भारतीय चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे.
टीम इंडियाचे 9 ऑक्टोबरचे वेळापत्रक-
पुरुष – भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा टी20, संध्याकाळी 7 वाजता
महिला- भारत विरुद्ध श्रीलंका महिला टी20 विश्वचषक 12 वा सामना, संध्याकाळी 7:30 वाजता
दोन्ही संघांच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर भारतीय पुरुष संघाने पहिल्या टी20 सामन्यात बांग्लादेशचा 7 गडी राखून पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचे लक्ष दिल्लीत पुन्हा एकदा बांग्लादेशला पराभूत करून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेण्याकडे असेल.
उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारतीय महिला संघाचा श्रीलंकेविरुद्धचा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. निव्वळ धावगती सुधारण्यासाठी भारताला केवळ हा सामना जिंकायचा नाही तर आशियाई चॅम्पियन्सचा मोठ्या फरकाने पराभव करायचा आहे.
हेही वाचा-
5-5 षटकांचा सामना, संघात केवळ 6 खेळाडू, या अनोख्या स्पर्धेत टीम इंडिया घेणार भाग
कर्णधारपद सोडूनही बाबर आझमला फलंदाजीत अपयश! खराब रेकाॅर्डची केली नोंद
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ‘या’ गोलंदाजाने घेतली सर्वाधिक वेळा Hat-Trick! दिग्गजही मागे