दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ब्रिटीशांनी भारत आणि पाकिस्तान असे दोन भाग केले. त्यानंतर दोन्ही देश एकमेकांचे शत्रू झाले. क्रिकेट जगतात असे तीन खेळाडू होऊन गेले जे भारत व पाकिस्तान अशा दोन्ही देशांकडून क्रिकेट खेळले. वाचा येथे.
परंतु, जर दोन्ही देश आज एकत्र असते तर भारतीय संघात हे ५ पाकिस्तानी खेळाडू आपल्याला खेळताना दिसले असते.
१. जावेद मियांदाद (Javed Miandad)
जावेद मियांदादसारखा दुसरा फलंदाज पुन्हा पाकिस्तानच्या भूमीत झाला नाही? जावेद मियांदादने पाकिस्तानकडून खेळत कसोटी सामन्यांमध्ये ८८३२ आणि वनडे सामन्यांमध्ये ७३८१ धावा केल्या आहेत.
त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये २३ शतकेही केली आहेत, तर एकदिवसीय सामन्यात त्यांनी ८ शतके केली आहेत.
७० च्या दशकात सुनील गावसकर आणि त्यांना परस्पर विरोधी म्हणून पाहिले गेले. परंतु, जर भारत-पाकिस्तान वेगळे नसते तर जावेद मियांदादसारखा फलंदाज म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळाले असते.
२. इम्रान खान (Imran Khan)
या यादीत जगातील महान अष्टपैलू इम्रान खानचे नावही ओघानेच येते. पाकिस्तानचा महान कर्णधार म्हणून इम्रान खानचे नाव घेतले जाते.
इम्रान खानने आपल्या कसोटी कारकीर्दीत ८८ सामन्यांत ३८०७ धावा केल्या आहेत आणि ३६२ गडी बाद केले आहेत. १७५ वनडे सामन्यात त्यांनी १८२ बळी घेतले व ३७०९ धावा केल्या आहेत.
जर हे दोन्ही देश वेगळे नसते तर कपिल देव यांच्या बरोबर इम्रान खान यांची जोडी नक्कीच बनवली असती.
३. वसीम अकरम (Wasim Akram)
या यादीमध्ये “सुलतान ऑफ द स्विंग” वसीम अक्रम यांचेही नाव आहे. क्वचितच जगातील असा एखादा देश असेल जो या गोलंदाजाला त्यांच्या संघात घेणार नाही.
वनडे सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अक्रम यांच्या नावावर आहे. अक्रम यांनी १०४ कसोटी सामन्यांमध्ये ४१४ बळी घेतले आहेत. ३५६ एकदिवसीय सामन्यात त्यांनी ५०२ बळी घेतले आहेत.
जर देश वेगळा नसता तर ते भारताकडून खेळताना देशाचा महान गोलंदाज ठरले असते.
४. वकार युनूस (Waqar Younis)
पाकिस्तानमधील आक्रमक गोलंदाज वकार युनूस यांचे नावही या यादीमध्ये आहे. एकदिवसीय सामन्यांत अक्रम यांच्यानंतर सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम वकार युनूसच्या नावावर आहे. गोलंदाजीमध्ये अक्रम आणि वकार ही जोडी जगातील सर्वात धोकादायक जोडी मानली जाते.
वकार युनूस यांनी ८७ कसोटी सामने आणि २६२ वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत त्यांनी ३७३ बळी घेतले आहेत. तर त्याने वनडेत ४१६ बळी घेतले आहेत. जर देश वेगळा नसता तर त्यांनी भारत देशासाठी अक्रमसमवेत सहकाऱ्याची भूमिका निभावली असती.
५. झहीर अब्बास (Zaheer Abbas)
१९६९ ते १९८५ दरम्यानचे पाकिस्तानचे महान फलंदाज झहीर अब्बास. झहीर यांनी त्याच्या कारकीर्दीत ७८ कसोटी सामन्यात ५०६२ धावा आणि ६२ एकदिवसीय सामन्यात २५७२ धावा केल्या आहेत.
झहीर अब्बास हे कसोटीतील महान फलंदाजांपैकी एक आहेत. जर देश वेगळा नसता तर ते देखील भारतीय संघात सहभागी झाले असते.
वाचा-– टाॅप ३- भारत व पाकिस्तानकडून क्रिकेट खेळलेले ३ क्रिकेटपटू