---Advertisement---

WTC फायनलपूर्वीच कांगारुंना वाटतेय विराट-पुजाराची भीती! चेतावणी देत पाँटिंग म्हणाला, ‘लवकर विकेट…’

Virat-Kohli-And-Cheteshwar-Pujara
---Advertisement---

येत्या 7 ते 11 जूनदरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना इंग्लंडच्या के ओव्हल मैदानावर पार पडणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने भारतीय खेळाडूंविषयी मोठे भाष्य केले आहे. पाँटिंगने विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांची विकेट ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले.

डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात (WTC Final) भारतीय संघाला आपल्या दिग्गज फलंदाजांवर विश्वास असेलच, पण रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याला आशा आहे की, एखादा युवा फलंदाजही उपयुक्त कामगिरी करेल.

काय म्हणाला पाँटिंग?
आयसीसीशी बोलताना पाँटिंग म्हणाला की, “ऑस्ट्रेलिया संघ विराटबाबत बोलत असेल यात कुठलीच शंका नाही. ते पुजाराबाबतही बोलत असतील. हे दोन खेळाडू महत्त्वाचे आहेत.”

पुढे बोलताना तो म्हणाला की, “पुजारा आधीही संघाला काट्यासारखा टोचत आला आहे आणि तेही ऑस्ट्रेलियात. ही खेळपट्टीही काही प्रमाणात आधुनिक ऑस्ट्रेलियन खेळपट्टीसारखी असेल. त्यांना माहितीये की, पुजाराची विकेट लवकर घ्यावी लागेल.” तो असेही म्हणाला की, “त्यांना हेदेखील माहिती आहे की, मागील काही आठवड्यात विराट कदाचित त्याच्या सर्वोत्तम प्रदर्शनाच्या खूपच जवळ पोहोचला आहे. मात्र, ती टी20 क्रिकेटची गोष्ट होती. त्यांनी मला सांगितेल की, त्यांना वाटत आहे की, तो आपल्या सर्वोत्तम प्रदर्शनाच्या जवळ पोहोचला आहे आणि ही एकमेव सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी मोठी चिंतेची बाब आहे.”

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याचे शानदार प्रदर्शन राहिले आहे. त्याने कसोटी कारकीर्दीतील सर्वाधिक धावा या ऑस्ट्रेलियाविरुद्धच केल्या आहेत. सर्वाधिक शतकेही पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्धच केली आहेत. आथा पाँटिंगलाही आशा आहे की, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुजारा महत्त्वाचा खेळाडू ठरेल.

भारताच्या तिसऱ्या क्रमांकावरील या विश्वासू खेळाडूने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना 24 कसोटी सामन्यात एकूण 2033 धावा केल्या आहेत. आता पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या नेतृत्वातील संघाविरुद्ध पुजारा भारतीय संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.

दुसरीकडे, भारतीय संघाला विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडूनही आशा असेल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील या एकाच सामन्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता निश्चित होईल. विराट या सामन्यात महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.  विराट आता जुन्या लयीत परतला आहे. मार्चमध्येच मालिकेच्या चौथ्या सामन्यात विराटने 186 धावांची खेळी साकारली होती. (cricketer virat kohli and cheteshwar pujara wicket will be key for australia in wtc final said ricky ponting)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्याला स्वत:ला सिद्ध करावंच लागेल…’, टीम इंडियातील रहाणेच्या पुनरागमनावर भारतीय दिग्गजाची प्रतिक्रिया
आता कशी आहे रिषभ पंतची तब्येत? ‘गब्बर’ने भेट घेऊन दिली अपडेट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---