भारतीय संघाने 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले आहेत. हे दोन्ही सामने जिंकल्यानंतर भारताचा आत्मविश्वास बळावला होता. मात्र, इंदोर कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा अतिआत्मविश्वास मोडून टाकला. ऑस्ट्रेलियाने भारताला 9 विकेट्सने पराभूत केले. या पराभवानंतर भारताच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या आशांनाही फटका बसला. अशात आता भारतीय संघाला 9 मार्चपासून अहमदाबादमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीत विजय मिळवून अंतिम सामन्यात सहजरीत्या पोहोचण्याची संधी असेल.
तिसऱ्या कसोटी सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) उज्जैनला पोहोचले. यादरम्यान विराट आणि अनुष्का (Virat And Anushka Visit Mahakaleshwar Temple In Ujjain) यांनी शनिवारी (दि. 4 मार्च) सकाळी महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. विराट आणि अनुष्का यांनी भस्म आरतीमध्येही भाग घेतला. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. यामध्ये विराटने गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि पारंपारिक पोषाख धोतर परिधान केले होते. यासोबतच त्याच्या कपाळावर चंदनाचा लेपही लावला होता.
https://twitter.com/harshkhatwa/status/1631884469685882881
https://twitter.com/Sisodia19Rahul/status/1631848474583998464
अलीकडच्या काही महिन्यांमध्ये विराटने अनेक धार्मिक स्थळांना भेट दिली आहे. विराटने यावर्षी जानेवारीमध्ये वृंदावन यात्राही केली होती. यादरम्यान त्याने वृंदावनमध्ये श्री परमानंद यांचा आशीर्वादही घेतला होता. खास बाब अशी की, वृंदावनमधून परतल्यानंतर विराटने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत शतक झळकावले होते. जानेवारी महिन्यातच विराट आणि अनुष्काने ऋषिकेशच्या दयानंद गिरी आश्रमालाही भेट दिली होती. तिथे दोघेही एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.
https://twitter.com/Trend_VKohli/status/1631896032211771393
कसोटीत विराटचा फॉर्म खराब
विराट कोहली 34 वर्षांचा असून मागील काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये त्याने खास कामगिरी केली नाहीये. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चालू कसोटी मालिकेतील तीन सामन्यातही तो फ्लॉप ठरला आहे. विशेष म्हणजे, नोव्हेंबर, 2019नंतर कसोटी क्रिकेटमध्ये त्याने एकही शतक झळकावले नाहीये. म्हणजेच, भारतीय चाहते विराटच्या कसोटी शतकाची तीन वर्षांहून अधिक काळ वाट पाहतायेत.
विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चालू मालिकेत आतापर्यंत 5 डावात फलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने 22.20च्या सरासरीने 111 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी विराटने बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतही भाग घेतला होता, जिथे त्याने फक्त 45 धावा केल्या होत्या. (cricketer virat kohli anushka sharma mahakaleshwar temple indore video india vs australia series)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट की स्मिथ? शेन वॉर्नने सांगितलं होतं उत्कृष्ट कसोटी फलंदाज कोण ते…
वॉर्नने गोलंदाजीत अनेक विक्रम केले, पण फलंदाजीतील ‘हा’ दुर्मिळ कारनामाही त्याच्याच नावावर