भारत देशात आजपर्यंत परदेशातील ७१८ क्रिकेटपटू हे भारताविरुद्ध वनडे सामने खेळले आहेत. यातील अनेकांची विक्रमांचे इमले रचले तर काहींना विशेष कामगिरी करता आली नाही.
भारतात मर्यादीत षटकांच्या क्रिकेटला तसा मोठा प्रतिसाद मिळतो. ५२ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असलेल्या देशांत परदेशी खेळाडू वनडेत चमकदार कामगिरी करुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी प्रयत्नशील असतात. Cricketers with worst batting records in ODIs in India.
परंतु काही असेही क्रिकेटपटू आहेत ज्यांना भारतीय गोलंदाजांनी भारतात मान वर काढू दिलेली नाही. या लेखात अशाच खेळाडूंची माहिती घेणार आहोत.
५. कामरान अकमल
पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने वनडे कारकिर्दीत १५७ सामन्यात २६.०६च्या सरासरीने ३२३६ धावा केल्या. त्याची वनडे कारकिर्द तशी काही खूप चांगली राहिली नाही. असे असले तरीही त्याची भारतातील कारकिर्द तर अतिशय खराब राहिली. भारतात २००४ ते २०१३ या काळात अकमलने १५ सामन्यात १२ डावांत फलंदाजी करताना २ वेळा नाबाद राहत त्याने १३.५०च्या सरासरीने भारताविरुद्ध जेमतेम १३५ धावा केल्या. ४१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली. दोन वेळा तर तो ० धावेवर बाद झाला.
४. अॅंड्य्रु फ्लिंटाॅफ
इंग्लंडचा माजी कर्णधार अॅंड्य्रु फ्लिंटाॅफने वनडेत १४१ सामन्यात ३२.०१च्या सरासरीने ३३९४ धावा केल्या. परंतु त्यालाही भारतात चमकदार कामगिरी करता आली नाही. त्याने भारतात भारताविरुद्ध खेळताना २००२ ते २००८ या काळात १६ सामन्यात १६ डावात फलंदाजी करताना २०.८७च्या सरासरीने ३३४ धावा केल्या. यात त्याने एक अर्धशतक केले असून तो २ वेळा शुन्य धावेवर बाद झाला. या १६ सामन्यात त्याने विकेट्स मात्र १७ घेतल्या होत्या.
३. मारवान आटापटू
श्रीलंकेचा माजी कर्णधार राहिलेल्या आटापटूने २६८ वनडेत ३७.५७च्या सरासरीने ८५२९ धावा केल्या. यात त्याने १९९० ते २००७च्या या काळात भारताविरुद्ध भारतात १७ सामन्यात १७ डावात फलंदाजी करताना २४.७३च्या सरासरीने ३७१ धावा केल्या. यात त्याने २ अर्धशतके केली होती.
२. सनथ जयसुर्या
श्रीलंकेचा माजी कर्णधार व अष्टपैलू खेळाडू सनथ जयसुर्याने ४४५ वनडेत ३२.३६च्या सरासरीने १३४३० धावा व ३२३ विकेट्स घेतल्या आहेत. भारतात भारताविरुद्ध जयसुर्याने १९९० ते २००९ या काळात २५ सामन्यात २५.५४च्या सरासरीने ५६२ धावा केल्या आहेत. तसेच ९ विकेट्स घेतल्या आहेत.
१. माहेला जयवर्धने
श्रीलंकेचाच माजी कर्णधार राहिलेल्या माहेला जयवर्धनेने वनडे कारकिर्दीत ४४८ वनडेत ३३.३७च्या सरासरीने १२६५० धावा केल्या. भारतात भारताविरुद्ध १९९९ ते २०१४ या काळात फलंदाजी करताना त्याने २९.३३च्या सरासरीने ६१६ धावा केल्या. यात त्याने २ शतके व १ अर्धशतक केले. या तीन खेळी काढल्या तर त्याला बाकी १९ सामन्यात तर विशेष कामगिरी करता आलेली नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
–भारतात कसोटीत सुप्पर डुप्पर फ्लाॅप ठरलेले ५ महान क्रिकेटर
–एका आयपीएल हंगामात तब्बल १००० मिनीटं फलंदाजी करणारा एकमेव फलंदाज
-२००७ विश्वचषकातील हिरो म्हणतोय यावेळीचा टी२० विश्वचषक खेळणारचं