माजी भारतीय क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्जचा दीर्घकाळ खेळाडू अंबाती रायुडूने सीएसकेबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे. रायुडूने असा दावा केला आहे की चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2025 मध्ये पुनरागमन करू शकणार नाही. त्याने हे देखील मान्य केले की एमएस धोनीने देखील हे मान्य केले आहे. रविवारी चेन्नईच्या संघाने 8 सामन्यांपैकी सहावा सामना गमावला. त्यानंतर संघाचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग खूप कठीण झाला आहे. मुंबईच्या मैदानावर सीएसकेने फक्त 176 धावा केल्या होत्या. मुंबईने 177 धावांचे लक्ष्य 16व्या षटकातच पूर्ण केले.
रोहित शर्माने 6 षटकार आणि 4 चौकारांसह 76 धावांची नाबाद खेळी केली. सूर्यकुमार यादवनेही जलद अर्धशतक झळकावले. या सामन्यानंतर, अंबाती रायुडूने जिओ हाॅटस्टारशी बोलताना सांगितले की, “माझ्या मते ते या हंगामात परतणार नाहीत.” त्याचं हे विधान काहीसं स्पष्टसं झालं जेव्हा धोनीने स्वतः सामन्यानंतरच्या मुलाखतीत म्हटलं – “आम्ही पुढच्या हंगामासाठी आधीच तयारी सुरू केली आहे.”
धोनीचा फोकस आता नव्या दमाच्या खेळाडूंवर आहे. त्याला केवळ बेधडक नव्हे, तर शिस्तबद्ध आणि समर्पित क्रिकेट संस्कृती उभी करायची आहे. “आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून खेळायला हवं,” असं धोनी म्हणाला. कदाचित आयुष म्हात्रेसारख्या खेळाडूला पूर्ण संधी मिळण्याची वेळ आता आली आहे.
सीएसकेच्या कामगिरी आणि चुकांवर भाष्य करताना रायुडू म्हणाला की, चेन्नई सुपर किंग्जमध्ये मुंबईविरुद्धच्या सामन्यात हेतूचा अभाव होता. तो म्हणाला, “मधल्या षटकांमध्ये, सुमारे सात षटकांमध्ये फक्त 35 धावा झाल्या, ज्यामुळे त्यांना त्रास झाला. आता टी-20 क्रिकेटमध्ये कोणीही असे खेळत नाही. खेळ विकसित झाला आहे आणि मधल्या षटकांमध्येही संघांना चांगल्या स्ट्राईक रेटने धावा काढाव्या लागतात. सीएसकेकडे हेतू नव्हता.






