आयपीएल 2025 स्पर्धेतील तिसरा सामना रविवार 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. हा सामना चेन्नई सुपर किंग्स संघाने मुंबईचा दारुण पराभव करत जिंकला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाच्या विजयाचा सूत्रधार रचिन रवींद्रने एक आश्चर्यचकित होणार वक्तव्य केलं आहे. त्याच्या वक्तव्यामुळे माणसे या कारणाने हैराण होत आहेत की, त्याने रविचंद्रन अश्विनला क्रिकेटची खूप समज आहे हे वक्तव्य केलं आहे. त्याने महेंद्रसिंग धोनीचे नाव न घेता अश्विनच नाव घेतलं आहे.
या गोष्टीत कोणतीच शंका नाही की, रविचंद्रन अश्विन एक शानदार खेळाडू आहे. त्याने आंतरराष्ट्रीय पासून ते आयपीएल पर्यंत प्रभावी प्रदर्शन करून नाव कमावलं आहे. आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात अश्विनने 31 धावा देऊन एक विकेट्स घेतली.
या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करून 155 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सने 19.1 षटकात सामना जिंकला चेन्नईसाठी रचिन रवींद्रने 45 चेंडूत 65 नाबाद धावा केल्या. त्याने शेवट षटकार लावत विजय मिळवून दिला. आणि त्याच्या पारीमध्ये 2 चौकार आणि 4 षटकार झळकावले. पंधराव्या षटकात 116 धावांवर चेन्नई संघाचे 5 खेळाडू बाद झाले होते. एका क्षणी वाटत होते की, हा सामना मुंबईच्या दिशेने जात आहे, पण रचिन रवींद्रने तसे होऊ दिले नाही.
सामन्यानंतर रचिन रवींद्र संवादकर्त्यांशी बोलताना म्हटले की, अश्विन एक विश्वस्तरीय खेळाडू आहे. मी त्याच्या विरुद्ध काही सामने खेळले आहेत. तो संघासोबत त्याचा अनुभव आणि क्रिकेट बद्दल ज्ञान जोडून ठेवतो, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, तो संघाला गोलंदाजी बद्दल अनेक प्रकारच्या टिप्स देतो.
तो पुढे म्हणाला, त्याला खेळाबद्दल खूप चांगला समज आहे आणि तो भारताच्या अनेक खेळाडूंमध्ये एक महान खेळाडू आहे. मी त्यांना खेळताना बघून मोठा झालो आहे आणि त्यांच्यासोबत एका संघामध्ये खेळणं माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. आमच्याकडे खूप चांगले फिरकीपटू गोलंदाज आहेत आणि आमच्या संघाचं संतुलन देखील खूप चांगल आहे. जर एखाद्या सामन्यात कोणता गोलंदाज नाही खेळू शकला तर त्या बदल्यात देखील आमच्याकडे वेगळे पर्याय आहेत.