मुंबई । स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे आलेली आजीवन बंदी उठविण्याचा प्रयत्न करणारा पाकिस्तानचा फिरकीपटू दानेश कनेरियाने, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दुटप्पी धोरण अवलंबल्याचा आरोप केला आहे. पीसीबीने नुकतीच स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेल्या उमर अकमलवरील बंदी कमी केली आहे. त्यानंतर दानिश कनेरिया चांगलाच भडकला आहे. सट्टेबाजांच्या संपर्काची माहिती न दिल्याने अकमलवर हे निलंबन लागू करण्यात आले होते.
तसेच कनेरियाप्रमाणेच मोहम्मद अमीर, मोहम्मद असिफ आणि सलमान बट हे देखील स्पॉट फिक्सिंगसाठी दोषी आढळले होते. पण आता आमीर हा पाकिस्तानी संघाचा नियमित सदस्य आहे.
कनेरियानी पीटीआयला सांगितले की, “तुम्ही भ्रष्टाचाराला शून्य सहिष्णुता धोरण म्हणता. उमर दोषी आढळला परंतु त्याची बंदी अर्धी केली गेली. आमीर, आसिफ, सलमानलाही परत येण्याची संधी मिळाली, मग मला का नाही. माझ्या बाबतीत अशी उदारता का दाखविली जात नाही. ते म्हणतात की मी माझ्या हिंदू धर्माबद्दल बोलतो. पण जेव्हा पक्षवाद दिसतो, तेव्हा मी काय म्हणू.”
तो म्हणाला की, “उमर आपल्या कारकिर्दीत बहुतेक वेळा वादाच्या भोवर्यात अडकला आहे. त्याच्याबद्दल सहानुभूती आहे, मग माझ्यासाठी का नाही. असे करण्यासाठी त्याने कोणालाही लाच दिली का? ते म्हणतात की मी धर्माचे लेबल वापरून खेळतो. माझ्या नंतर कोणता हिंदू क्रिकेटपटू पाकिस्तानकडून खेळला आहे ते सांगा. इतक्या वर्षांत त्यांना एखादा हिंदू खेळाडू खेळण्यास योग्य वाटला नाही. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
आयर्लंड विरुद्ध इंग्लंडचा मोठा विजय, या गोलंदाजाने टाकले तब्बल ३५ डॉट बॉल
क्रिकेट फॅनने विचारले तुझे वय काय? शाहिद आफ्रिदीने दिले ‘हे’ उत्तर
इंग्लंडला विश्वविजेतेपद जिंकण्यासाठी आयपीएलची झाली अशी मदत, मॉर्गनने केला खुलासा
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: असे ३ परदेशी खेळाडू, ज्यांचा फॉर्म ठरेल त्यांच्या संघासाठी सर्वाधिक फायद्याचा
आपल्या देशासाठी जखम झालेलं स्वत:चं बोट कापायलाही तयार झालेला क्रिकेटर
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ७- हेडनची पर्थच्या मैदानावर कसोटीतील वनडे स्टाईल फटकेबाजी