आयपीएल 2021 मध्ये झालेल्या 7 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सवर 3 गडी राखून विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 147 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्स संघाने 19.4 षटकांत 7 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. राजस्थान रॉयल्सच्या या विजयात डेव्हिड मिलर, क्रिस मॉरिस आणि जयदेव उनाडकट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यानंतर सादरीकरणात बोलताना दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने आपल्या पराभवाबद्दल नाराजी व्यक्त करत पराभवाचे कारण सांगितले.
सामन्यानंतरच्या सादरीकरणात कर्णधार पंत खूप निराश दिसत होता. त्याच्या संघातील फलंदाजांनी 15-20 धावा कमी केल्यामुळे या सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याचे त्याने कबूल केले. तसेच सामन्याच्या अंतिम वेळी मैदानावर भरपूर दव पडल्याने राजस्थानच्या फलंदाजांना फलंदाजी करण्यास सोपे झाल्याचे तो म्हटला. एकंदरीत त्याने आपल्या संघातील फलंदाजांना आणि सामन्यादरम्यान पडलेल्या दवाला पराभवाला जबाबदार धरले.
पराभवाबद्दल आपल्या निवेदनात त्याने म्हटले आहे की, “सुरुवातीला आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पण शेवटी आम्ही त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्यात अयशस्वी ठरले. शेवटी आम्ही अजून चांगली गोलंदाजी करू शकलो असतो. तो एक खेळाचा भाग झाला. परंतु शेवटी पडलेल्या दवाने देखील या पराभवात मोठी भूमिका बजावली. दुसर्या डावात मैदानात खूप दव पडले होते, त्यामुळे आम्ही कमी गतीच्या चेंडूवरही त्यांना रोखू शकलो नाही. कदाचित शेवटी आम्हाला आणखी चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता होती.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “आम्ही फलंदाजी करताना अजून 15-20 धावा करण्यात अपयशी ठरलो. परंतु तरीदेखील आम्ही या धावसंख्येवर स्वत:साठी चांगली संधी निर्माण केली होती. या सामन्यात गोलंदाजांनी आम्हाला खूप चांगली सुरुवात करून दिली होती. पण आम्ही विजय मिळवण्यात अपयशी ठरलो. मात्र या सामन्यातील आमच्या चुका जाणून घेऊन पुढील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करायला आम्हाला आवडेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या सामन्यातील ‘त्या’ निर्णयाबद्दल संजूने मांडले मत; म्हणाला, “मी १०० वेळा तो सामना खेळलो तरी…”
अटीतटीच्या लढतीनंतर राजस्थानची विजयाची नौका पार, कर्णधाराने ‘या’ खेळाडूंना म्हटले विजयाचे शिल्पकार
इज्जत भी, पैसा भी! पहिल्या सामन्यातील ‘त्या’ प्रसंगाची काढली कसर; दिग्गजाकडून मॉरिसचं हटके कौतुक