रविवारी (२९ मे) इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ यावर्षी देखील विजेतेपद जिंकू शकला नाही. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सने त्यांना मात देऊन अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर आरसीबीचा संघ शेवटी हर्डलमध्ये एकत्र दिसला. दिनेश कार्तिक यावेळी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
हंगामातील प्रवास संपल्यानंतर आरसीबीचा संघ शेवटचा एकदा एकत्र जमला. हर्डलमध्ये संघातील सर्व खेळाडूंनी त्यांचा अनुभव आणि भावना व्यक्त केल्या. अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यावर्षी आरसीबीमध्ये सहभागी झाला होता आणि त्याने चांगले प्रदर्शन करून दाखवले. संघाच्या समारोपाच्या कार्यक्रमात कार्तिकने सर्वात जास्त लक्ष वेधले. विजेतेपद न मिळाल्यामुळे इतर खेळाडूंपेक्षा कार्तिक जास्त दुःखी दिसला.
View this post on Instagram
संघातील सर्वजण जमल्यानंतर कार्तिक म्हणाला की, “माझ्यासाठी आयपीएलचा हंगाम चांगला राहिला, पण मी संघासाठी खूप दुःखी आहे. कारण जेव्हा तुम्ही चांगले खेळत असता तेव्हा वाटते की स्पर्धा जिंकावी. आपण सर्वांनीच खूप मेहनत केली होती, पण आमच्यासाठी हा हंगाम चांगला राहिला. आपल्यावर खूप दबाव होता, पण आपण दबावात खूप चांगले खेळलो. आरसीबीसाठी सर्वात चांगली बाब ही राहिली की, युवा खेळाडूंनी पुढे येऊन मोर्चा सांभाळला.”
“आयपीएलमध्ये मी खूप संघांचा भाग राहिलो आहे, पण या फ्रँचायझीचा चाहता वर्ग सर्वात्तम आहे. मला चाहत्यांकडून जेवढे प्रेम मिळाले, ते मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या वयात हे करणे तेव्हाच शक्य होते, जेव्हा तुम्हाला प्रेम मिळते. मी चाहत्यांचे मनापासून आभार मानतो. आम्ही पुढच्या वर्षी पुनरागमन करण्याचा प्रयत्न करू.” असे कार्तिक पुढे बोलताना म्हणाला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘दडपणाखाली होतो, पण त्याच्या प्रेरणादायी शब्दांनी मदत केली’, बटलरने ‘या’ दिग्गजाला दिले यशाचे श्रेय
IPL च्या समारोपाची जंगी तयारी; मोदी, शहांच्या उपस्थितीत ‘हे’ सेलिब्रेटी करणार परफॉर्मन्स
IPL च्या समारोपाची जंगी तयारी; मोदी, शहांच्या उपस्थितीत ‘हे’ सेलिब्रेटी करणार परफॉर्मन्स