दुलीप ट्रॉफी 2025 चा उपांत्य सामना सध्या पश्चिम विभाग आणि मध्य विभाग यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात पश्चिम विभागाने पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर 6 गडी गमावून 363 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड आणि तनुश कोटियन यांनी संघासाठी शादनदार फलंदाजी केली आहे. या खेळाडूंनी मध्य विभागाच्या गोलंदाजांना खंबीर ठेवले आणि त्यांना परचण्याची कोणतीही संधी दिली नाही.
ऋतुराज गायकवाडने डावाच्या सुरुवातीपासूनच संयमी फलंदाजीचा नमुना दाखवला. तो घाई न करता क्रीजवर राहिला त्याने 206 चेंडूत 184 धावा केल्या, ज्यामध्ये 25 चौकार आणि एक षटकार होता. त्याचे द्विशतक फक्त 16 धावांनी हुकले. त्याची विकेट सरांश जैनने घेतली. गायकवाडने यापूर्वी बुची बाबू स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळताना हिमाचल प्रदेशविरुद्ध 133 धावांची खेळी केली होती. आता त्याने येथे आपली दमदार फलंदाजी सुरू ठेवली.
पश्चिम विभागाच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. यशस्वी जयस्वाल (04 धावा) आणि हार्विक देसाई (01) लवकर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने आर्य देसाईसोबत तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची उपयुक्त भागीदारी केली आणि पश्चिम विभागाच्या संघाला परत आणण्याचा प्रयत्न केला. गायकवाडने 85 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दुपारच्या सत्रात त्याने 131 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या आणि अशा प्रकारे दुसरे अर्धशतक फक्त 51 चेंडूत पूर्ण झाले.
ऋतुराज गायकवाडने त्याच्या डावात फिरकी गोलंदाज हर्ष दुबे आणि ऑफ-स्पिनर सरांश जैन यांच्याविरुद्ध सहज धावा काढल्या. त्याने लेट कट आणि स्क्वेअर कटचा चांगला वापर केला. गायकवाडला धावा काढण्यात कोणतीही अडचण आली नाही. दुसरीकडे, तनुष कोटियननेही जोरदार फलंदाजी केली. त्याने 121 चेंडूत 65 धावा केल्या, ज्यामध्ये पाच चौकारांचा समावेश होता. या खेळाडूंमुळे पश्चिम विभागाचा संघ चांगल्या स्थितीत पोहोचू शकला आहे. कोटियनसोबत सध्या शार्दुल ठाकूर खेळत आहे. त्याने 24 धावा केल्या आहेत. सेंट्रल झोनकडून खलील अहमद आणि सरांश जैन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर दीपक चहर आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.






