भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात १ जुलैपासून कसोटी सामना खेळला जाणार आहे. या कसोटी सामन्याची प्रतिक्षा फक्त दोन्ही संघातील खेळाडूच नाही तर चाहतेही करत आहेत. हा कसोटी सामना एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे खेळला जाणार आहे. या मैदानावर भारतीय संघाची कामगिरी आणि सध्याचा इंग्लंडचा संघ पाहिला असता भारतीय संघाला हा सामना जिंकणे तितके सोपे नाही.
या मैदानावर भारत आणि इंग्लंडमध्ये ७ कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यातील सहा सामन्यात यजमान संघ वरचढ ठरला आहे, तर भारताने या मैदानावर एकही सामना जिंकलेला नाही. एक सामना अनिर्णीत राहिला आहे. त्यामध्ये मन्सूर अली पतौडी खान, अजित वाडेकर, वेंकटराघवण, मोहम्मद अझरुद्दीन, एमएस धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) या भारतीय कर्णधारांना या मैदानावर अपयश आले आहे. तर भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव यांनी १९८६मध्ये संघाचे नेतृत्व करताना सामना अनिर्णीत राखला होता.
या कसोटीमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) संघात उपस्थित नसला तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. हा सामना भारताला मालिका जिंकण्यासाठी जिंकावा किंवा अनिर्णीत ठेवावा लागेल. असे झाले तर कपिल देव आणि बुमराह याच्या बाबतीत एक योगायोग होईल.
भारतीय क्रिकेटमध्ये शक्यतो खूप कमी वेळा वेगवान गोलंदाजांना संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. दिग्गज कपिल देव (kapil Dev) याला अपवाद ठरतात. कपिलने १९८७ मध्ये कर्णधाराच्या रूपात भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर तब्बल ३६ वर्ष झाले, पण एकाही वेगवान गोलंदाजाने भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व केले नाहीये. इंग्लंडविरुद्ध १ जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात मात्र जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ही परंपरा मोडू शकतो.
त्याचबरोबर कपिल याच्या कर्णधारपदाखाली भारताने एजबस्टन येथे १९८६ला झालेला सामना अनिर्णीत राखला होता. भारताने बुमराहच्या कर्णधारपदाखाली सामना जिंकला किंवा अनिर्णीत राखला तर तो एजबस्टन येथे उत्तम नेतृत्व करणारा दुसरा भारतीय कर्णधार बनेल, किंवा दोघांच्याही नेतृत्वाखाली संघाला पराभवाचा सामना करावा लागला नाही.
एजबस्टनमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी रेकॉर्ड
(सामने- ७, विजय – ०, पराभव – ६, अनिर्णीत -१)
१९६७: भारत १३२ धावांनी पराभूत
१९७४: भारत एक डाव आणि ७८ धावांनी पराभूत
१९७९: भारत एक डाव आणि ८३ धावांनी पराभूत
१९८६: सामना अनिर्णीत
१९९६: भारत ८ विकेट्सने हरला
२०११: भारतीय संघ एक डाव आणि २४२ धावांनी पराभूत
२०१८: भारत ३१ धावांनी पराभूत
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ENGvsIND: “विराटने शतक केले नाही तरी चालेल, मात्र…” वाचा नक्की काय म्हणाला द्रविड
ENGvsIND: इंग्लंडच्या फलंदाजाविरोधात बुमराह ऍण्ड कंपनीची काय असेल रणनीती? वाचा सविस्तर
नर्व्हस नायंटीजचा शिकार झाला असता हुड्डा; कसा वाचला सामन्यानंतर सांगितले मित्राला