आयपीएल २०२६ स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. धरमशाळेच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात पंजाबने मुंबई इंडियन्स संघासमोर विजयासाठी २०१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना तिलक वर्माने दमदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर पंजाबने मुंबईवर शेवटच्या षटकात दमदार विजय मिळवला. या विजयाचा गुणतालिकेत मुंबई इंडियन्सला काहीच फायदा झालेला नाही. कारण मुंबईचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पण या पराभवानंतर पंजाब किंग्स संघाचं टेन्शन वाढलं आहे. दरम्यान कसं असेल प्लेऑफमध्ये जाण्याचं समीकरण? जाणून घ्या.
पंजाब किंग्स संघाला आधी प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. कारण या संघाने सुरुवातीच्या सलग ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर पुढील पाचही सामन्यांमध्ये पंजाबला लागोपाठ पराभवाचा सामना करावा लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे अजूनही २ सामने शिल्लक आहेत. पंजाबचा पुढील सामना पंजाब किंग्स संघाविरूद्ध होणार आहे. तर शेवटच्या सामन्यात पंजाबचा सामना लखनौविरुद्ध होणार आहे.
पंजाब किंग्स संघाला जर प्लेऑफ गाठायचं असेल, तर एकमेव मार्ग शिल्लक आहे. तो म्हणजे, पंजाबला पुढील दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे. सध्या पंजाबचे १३ गुण असून हा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. पंजाबचं टेन्शन वाढवणारी बातमी म्हणजे, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ देखील प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. त्यामुळे पंजाबला पुढील दोन्ही सामने कुठल्याही परिस्थितीत जिंकावे लागणार आहेत.
चेन्नई सुपर किंग्स संघाचा सामना १२ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. तर चेन्नईकडे देखील प्लेऑफमध्ये जाण्याची संधी असणार आहे. पण मार्ग मुळीच सोपा नसेल. जर चेन्नईने पुढील दोन्ही सामने जिंकले, तर त्यांचे १६ गुण होतील. तर राजस्थान रॉयल्सने आपले पुढील ३ पैकी २ सामने जिंकले, त्यांचे देखील १६ गुण होतील. पंजाबला जर टॉप ४ मध्ये प्रवेश करायचा असेल, तर त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला पराभूत करावं लागणार आहे. त्यानंतर साखळी फेरीत लखनौ सुपर जायंट्स संघाविरूद्ध होणारा सामना पंजाबसाठी निर्णायक ठरेल.






