भारतीय क्रिकेटमध्ये, ‘क्रिकेटचा देव’ मानला जाणारा सचिन तेंडुलकरने नुकताच आपल्या लग्नाचा २६ वा वाढदिवस साजरा केला आहे. अंजली क्वचितच मैदानात येऊन लाईव्ह सामना पाहायची, परंतु अंजलीने देखील सचिनला वाईट काळात तितकाच आधार दिला होता. त्यांच्या या खास दिवसाला आणखी खास बनवण्यासाठी,अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच सचिनचा बालपणीचा मित्र आणि संघसहकारी विनोद कांबळी याने देखील तेंडुलकर दांपत्याला अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिन आणि अंजली यांच्या आयुष्यातील खास क्षण आणखी खास बनवण्यासाठी,विनोद कांबळीने ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या.त्याने लिहिले की, “सचिन आणि अंजलीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दोन सर्वात गोड लोक. तुम्हा दोघांना भरपूर आनंद मिळो. देव तुम्हाला सदैव आशीर्वाद देईल.”
Happy wedding anniversary to my dearest @sachin_rt and Anjali. Two of the most lovely people. Wish you both lots of happiness and may God bless always! pic.twitter.com/1u2nxdQcGk
— Vinod Kambli (@vinodkambli349) May 25, 2021
सचिनचा सर्वात जवळचा कोणी मित्र असेल तर,तो विनोद कांबळी आहे. शालेय क्रिकेटमध्ये सचिनसह सर्वाधिक धावांची भागीदारी करत विश्वविक्रम करणाऱ्या या क्रिकेटपटूने सचिन सोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील खेळले. विनोद कांबळीला फार काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिकून राहता आले नाही. परंतु, सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले.
फार कमी लोकांना ही गोष्ट माहीत आहे की, अंजली ही सचिनपेक्षा ६ वर्षांनी मोठी आहे. सचिन अनेकदा व्यक्त झाला आहे की, अंजली आणि त्याची भेट कशी झाली होती. क्रिकेटच्या मैदानावर,गोलंदाजांचा घाम काढणारा सचिन, प्रेमाच्या खेळपट्टीवर मात्र पहिल्याच चेंडूवर क्लीनबोल्ड झाला होता.अंजलीला विमानतळावर पाहताच, सचिन तिच्या प्रेमात पडला होता. यशाच्या शिखरावर असताना, २४ मे १९९५ रोजी सचिन आणि अंजली यांचा विवाह झाला होता. त्यावेळी सचिन अवघ्या २२ वर्षांचा होता.
अंजली पेशाने डॉक्टर आहे. जेव्हा अंजली आणि सचिनची पहिली भेट झाली होती. तेव्हा सचिन एक मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन ब्राह्मण कुटुंबातून होता. तसेच अंजली, उद्योगपती आनंद मेहता आणि ब्रिटिश सामाजिक कार्यकर्ती अनाबेल मेहता यांची कन्या होती. अंजली फार क्वचितच मैदानात येऊन सामना पाहताना दिसून आली आहे. परंतु २०१३ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर हे दोघेही सुखी आयुष्य जगत आहेत. त्यांना सारा आणि अर्जून अशी २ अपत्यही आहेत. सारा आईप्रमाणे वैद्यकिय क्षेत्रात शिक्षण घेत आहे. तर अर्जूनने सचिनच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेट क्षेत्रच निवडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! आयपीएलच्या आयोजनामुळे भारताची ‘ही’ मोठी द्विपक्षीय मालिका रद्द?
महत्त्वाची बातमी! भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील टी२० मालिकेत बदल; ‘या’ दिवशी होणार तिसरा सामना