भारताचा मर्यादीत षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. तेथे भारतीय संघाला श्रीलंका विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. याच भारतीय युवा संघामध्ये पृथ्वी शॉची देखील निवड झाली आहे. या संदर्भातच भारतीय संघाचे माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राने पृथ्वी शॉबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आकाश चोप्राच्या मते, सध्या पृथ्वी शॉ उत्कृष्ट कामगिरी करत आहे. जर त्याने यात सातत्य ठेऊन श्रीलंका दौऱ्यावर उत्कृष्ट फलंदाजी केली, तर टी-20 विश्वचषकादरम्यान भारतीय संघाची निवड करताना निवडकर्त्यांना अनेक अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हे पाहणे खूपच मनोरंजक देखील असेल.
आपल्या यूट्यूब चॅनलवर आकाश चोप्रा म्हणाला की, “पृथ्वी शॉ ज्याप्रकारे फलंदाजी करतो, मी त्याच्या फलंदाजीचा खूप आनंद घेत असतो. पृथ्वी शॉच्या खेळण्याच्या पद्धतीमुळे क्रिकेटच्या विश्वामध्ये वादळ निर्माण होते. त्याच्या या खेळण्याच्या पद्धतीमुळे महत्त्वाचे नाही की त्याने प्रत्येक सामन्यात धावा बनविल्या पाहिजेत. ज्या दिवशी तो धावा बनवेल, त्यादिवशी विरुद्ध संघावर दबाव निर्माण होईल.”
आकाश चोप्रा पुढे शिखर धवनबद्दल म्हणाला की, “आता श्रीलंका मालिका बघण्यासारखी आहे. जरी या मालिकेमध्ये शिखर धवनने दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली तर मग त्याच्याकडे कसे दुर्लक्ष केले जाईल. शिखर धवनने आयपीएलमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. तो श्रीलंका विरुद्ध देखील अशीच कामगिरी करेल. जर पृथ्वी शॉने देखील श्रीलंका विरुद्ध उत्कृष्ट फलंदाजी करत धावा बनवल्या तर हा सामना बघण्यासाठी खूप मजा येईल. परंतु, ही निवडकर्त्यांसाठी एक गोड डोकेदुखी होईल.”
आकाश चोप्राचे असे मत आहे की, रोहित शर्माबरोबर सलामीच्या ठिकाणी दुसर्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून विराट कोहली किंवा केएल राहुल यांच्यात सध्या युद्ध आहे. आकाश म्हणाला, “राहुल हा सामना जिंकण्याची शक्यता आहे, कारण रिषभ पंत या मधल्या फळीत खेळू शकतो. राहुलला देखील मधल्या फळीत खेळायला पाठवण्याची गरज नाही.”
आकाश चोप्रा पुढे म्हणाला की,”तळातल्या क्रमांकावर हार्दिक पांड्या, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा हे खेळाडू खेळू शकतात. परंतु, माझी केएल राहुलला वरच्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहण्याची इच्छा आहे. केएल राहुल जरी सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात नाही उतरला तरीही तीन नंबरच्या फलंदाजाच्या स्वरूपात त्याला मैदानावर पाठविले पाहिजे. जर विराट कोहली सलामीला फलंदाजी करत असेल, तर राहुल नक्कीच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास मैदानावर उतरू शकेल.”
आता हे पाहण्यासारखे असेल की, टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघामध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
अरे व्वा! विराट कोहली आहे शाहिद आफ्रिदीचा आवडता खेळाडू ; ‘हे’ ७ क्रिकेटर्सही यादीत सामील