कोरोना व्हायरसच्या संकटामुळे मागील काही महिन्यांपासून ठप्प झालेले क्रीडा क्षेत्र हळुहळु पुन्हा सुरु होत आहेत. पण असे असले तरी अनेक स्पर्धांच्या आयोजनावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. त्यातील एक स्पर्धा म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणारा टी२० विश्वचषक. १६ संघ सहभागी होणाऱ्या या विश्वचषकाचे आयोजन करण्यासाठी अनेक आव्हानं असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलिया म्हणत आहे.
त्यामुळे सध्या अनिश्चित काळासाठी स्थगित झालेला आयपीएलचा १३ वा मोसम आयोजित होण्याच्या आशा वाढल्या आहेत. आयपीएल फ्रँचायझींना बीसीसीआयकडून आयपीएलच्या भविष्याबद्दल निर्णायक भाष्याची अपेक्षा आहे . आयपीएलच्या या मोसमात किती सामना होऊ शकतात, तसेच हा मोसम भारतात होणार की परदेशात असे अनेक प्रश्नांची उत्तरे अजून अनुत्तरित आहेत.
फ्रँचायझींचे मत आहे की जर या मोसमाचे आयोजन झाले तर टीव्हीवर त्यांना विक्रमी दर्शक मिळतील.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार किंग्स इलेव्हन पंजाबचे सह संघमालक नेस वाडिया म्हणाले, ‘सध्याची परिस्थिती पाहता 16 संघांसह टी२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात गुंतागुंत आहे. आयपीएल आयोजित करणे देखील सोपे होणार नाही. मैदानाच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी योग्य पायाभूत सुविधा असतील अशा ठिकाणी हे आयोजित केले जावे.’
सध्या आयसीसीने विश्वचषकाच्या आयोजनाचा निर्णय पुढेल महिन्यात ढकलला आहे. तर बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आयपीएलचे आयोजन करण्याचा विचारात असल्याची चर्चा आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी वंकी म्हैसूर यांनी गेल्या आठवड्यात लीगच्या स्वरूपात ‘छेडछाड’ करण्यास एका मीडिया इव्हेंट दरम्यान निषेध केला होता. पण आयपीएलचे सर्व भागधारक या गोष्टीशी सहमत नाहीत.
वाडिया यांनी आयपीएलचा कालावधी कमी करण्याबद्दल म्हटले आहे की ‘मला खात्री आहे की संपूर्ण आयपीएल आयोजित करण्यासाठी बीसीसीआय सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतु आम्हाला कमी सामने असलेल्या स्पर्धेतही अडचण नाही. आयपीएलने स्पर्धेचे आयोजन करण्यात मोठी लवचिकता दर्शविली आहे आणि कोविड -१९ दरम्यानही आम्हाला या परिस्थितीला समजून घेतले पाहिजे. २००९ मध्ये आम्ही एका महिन्यांत भारताऐवजी दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा आयोजित केली होती.’
कोरोना व्हायरसची प्रकरणे भारतात वाढत आहेत, त्यामुळे परदेशात आयपीएल आयोजित करणे देखील हा एक पर्याय आहे. यासाठी युएई आणि श्रीलंकेने या स्पर्धेचे आयोजन करण्यास यापूर्वीच रस दाखविला आहे. तर कोरोना व्हायरसचा सर्वात कमी धोका असलेल्या देशांपैकी न्यूझीलंडदेखील एक पर्याय आहे.
वाडिया म्हणाले की, सर्व भागधारक आपापल्या सहमतीने स्पर्धेचे ठिकाण आणि सामन्यांची संख्या सहजपणे ठरवू शकतात.
आयपीएलच्या दुसर्या संघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, त्यांना कमी सामने असलेली स्पर्धा नको आहे आणि बीसीसीआयने लवकरात लवकर तारखा जाहीर करावी अशी अपेक्षा आहे जेणेकरून संघांच्या संभाव्य प्रायोजकांना पुरेसा वेळ मिळेल.
ते अधिकारी म्हणाले, ‘बीसीसीआय कशाची वाट पाहत आहे हे मला समजत नाही. त्यांनी आत्तापर्यंत तारखांची घोषणा करायला हवी होती. ऑगस्ट-सप्टेंबर असो किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर असो (विश्वचषक होत नसल्यास).’
‘युएई बोर्डाशी बोला आणि पुढे जा. ते बहरैन आणि मस्कतचा विचार करू शकतात. आयसीसी निर्णयाला उशीर करत असल्याने बीसीसीआयसमोरही पेचप्रसंग आहे,’ असेही हे अधिकारी म्हणाले.
तसेच स्पर्धेतील सामन्यांची संख्या कमी झाली तरीसुद्धा प्रायोजकांची समस्या नसेल अशीही वाडियांची अपेक्षा आहे.
त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जच्या एका सूत्राने सांगितले की, स्पर्धेवरील प्रायोजकांचा होणारा परिणाम स्पर्धा जवळ येताच कळेल. सूत्रांनी सांगितले की, ‘तारखा जाहीर झाल्यानंतरच प्रायोजक संघांकडे येतील.’
ट्रेंडिंग घडामोडी –
‘ते’ असे एक कारण, ज्यामुळे विराट आहे रोहितपेक्षा भारी
पहा व्हिडिओ- २१ वर्षांपूर्वी झाला होता क्रिकेट विश्वचषकातील सर्वात रोमांचकारी सामना
टी२० विश्वचषकात टीम इंडियाकडून फायनल की आयपीएलमध्ये मुंबईकडून फायनल? हिटमॅन म्हणतो…