भारत विरुद्ध इंग्लंडच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसर्या कसोटी सामन्याचा मंगळवारी(१६ फेब्रुवारी) निकाल लागला. पहिला कसोटी सामना गमावल्याने बॅकफूटवर गेलेल्या भारतीय संघाने मागील सामन्यातील चुका सुधारून या सामन्यात पुनरागमन केले आणि ३१७ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे मालिका आता १-१ अशी बरोबरीत आली आहे.
भारताच्या या विजयामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट आली आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघावर कडवी टीका होत होती. मात्र दुसर्या सामन्यातील विजयामुळे चाहत्यांनी टीकाकारांना मिम्सच्या माध्यामातून चोख प्रत्युत्तर दिले आहे.
सोशल मिडीयावर मिम्सचा सुळसुळाट
भारतीय संघाच्या धमाकेदार विजयानंतर सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊस पडला आहे. चाहत्यांनी या मिम्सच्या माध्यामातून इंग्लंडच्या खराब कामगिरीला लक्ष्य केले आहे. तसेच खेळपट्टीवरून टीका करणार्या इंग्लंडच्या माजी खेळाडूंनाही प्रत्युत्तर दिले आहे.
या सामन्यात शतकी खेळी तसेच ८ बळी घेण्याचा पराक्रम करणारा आर अश्विनने देखील मिम्सचे जग व्यापले आहे. अश्विनच्या फलंदाजीने प्रभावित झालेल्या नेटकऱ्यांनी सिनेमातील संवादांचा आधार घेत इंग्लंडला ट्रोल केले आहे.
https://twitter.com/AkshunVerma1/status/1360838633641549824
Is it you Sir @MichaelVaughan ?? #ENGvIND #BCCI @BCCI pic.twitter.com/VGcuRA99UY
— AviS (@AviEco04) February 16, 2021
#Pitch,#INDvEND,#ENGvIND,#Vaughan
According to Michael Vaughan
Pitch in England. Pitch in India pic.twitter.com/OpVlua2e4u— ABHISHEK KUMAR (@tweet_abhi1989) February 14, 2021
In Lunch Break😭 🤣✌#ENGvIND pic.twitter.com/3TzH1qv4TA
— 🥳 JETHA LAL 🥳 (@_babuchak_1) February 15, 2021
#ENGvIND #INDvsENG #INDvENG
Axar Patel after talking wicket of joe root in his first test :- pic.twitter.com/NXCtvRbpB2— Er. Shubham Kansal (@iamkansal77) February 14, 2021
https://twitter.com/PR0T0N_18/status/1361578186174160898
Ash Anna During Batting 🔥🔥💪💪👏👏 pic.twitter.com/Q1m1T0ZghO
— Prof cheems ॐ (@Prof_Cheems) February 15, 2021
Ishant to Rory burns after sending him on duck …. #ENGvIND pic.twitter.com/bZYUw7fx2s
— 💲🅰〽️ (@Samcasm7) February 14, 2021
दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या दृष्टीने भारतासाठी हा विजय अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर खेळविण्यात येणार्या अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध खेळण्याच्या भारताच्या आशा या विजयामुळे जिवंत राहिल्या आहेत.
जर भारताला अंतिम फेरीत स्थान निश्चित करायचे असेल, तर उर्वरित दोन सामन्यांपैकी किमान एका सामन्यात विजय मिळवणे आवश्यक असेल. मात्र इंग्लंडने यातील एकही सामना इंग्लंडने जिंकल्यास भारताला अंतिम फेरी गाठता येणार नाही. या समीकरणांमुळे दोन्ही संघ उर्वरित सामन्यांत पूर्ण ताकदीने उतरतील. त्यामुळे मालिका अतिशय रंगतदार ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अक्षर पटेलने गाजवले पदार्पण! तब्बल ४२ वर्षांनंतर ‘असा’ पराक्रम करणारा बनला दुसराच भारतीय
पराभवानंतरही रूटने असे भाष्य करत जिंकले भारतीय चाहत्यांचे मन; म्हणाला…
कॉट आणि बोल्ड बाय दिशा! भारतीय क्रिकेटर जयंत यादव अडकला लग्नाच्या बेडीत