---Advertisement---

IND vs ENG: भारतीय संघ इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, तर यशस्वी जयस्वाल विश्वविक्रमाच्या जवळ!

---Advertisement---

भारत आणि इंग्लंड (Test Series IND vs ENG) संघामध्ये कसोटी मालिकेला सुरुवात 20 जून पासून होणार आहे. लीड्समध्ये पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. या मालिकेदरम्यान केएल राहुल (Kl Rahul), कर्णधार शुभमन गिल (Shubman gill), यशस्वी जयस्वाल (Yashasvi jaiswal), रिषभ पंत (Rishbh Pant), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद सिराज (Mohmmad Siraj) यांच्याकडे त्यांच्या करिअरमध्ये एक मोठा विक्रम रचण्याची संधी असणार आहे. या मालिकेत भारतीय संघ (Indian cricket team) 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. चला तर जाणून घ्या की कोणत्या कोणत्या खेळाडूंकडे इतिहास रचण्याची संधी आहे.

शुबमन गिलकडे (Shubman gill) इतिहास रचण्याची संधी असेल, म्हणजेच त्याच्याकडे कसोटीमध्ये 2000 पूर्ण करण्याची संधी असणार आहे. भारतीय कसोटी कर्णधार कसोटी मालिकेदरम्यान 88 धावा केल्यानंतर त्याच्या करिअरमध्ये 2000 धावा पूर्ण करेल.

यशस्वी जयस्वालकडे (Yashasvi jaiswal) सुद्धा इतिहास रचण्याची संधी असणार आहे. गिलकडे 2000 धावांसहित सर्वात वेगाने 50 षटकार झळकावण्याची संधी असेल. जयस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये 19 सामने खेळले आहेत आणि त्याच्या 1798 धावा आहेत. इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत 202 धावा केल्यानंतर तो भारतासाठी कसोटीमध्ये सर्वात वेगाने 2000 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरेल. तसेच 11 षटकार झळकवताच गिल कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 50 षटकार झटकवणारा फलंदाज ठरेल. यासोबत कसोटीमध्ये जयस्वाल 3000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्यासाठी 464 धावा दूर आहे. 43 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 59 डावांमध्ये यशस्वी जयस्वालने 46.10 च्या सरासरीने 2536 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 5 शतक आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे.

कसोटी मालिकेदरम्यान के एल राहुलकडे (KL Rahul) सुद्धा इतिहास रचण्याची संधी असणार आहे. राहुल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9000 धावा पूर्ण करण्यासाठी केवळ तो 435 धावा दूर आहे. सराव दरम्यान राहुलने 116 आणि 51 धावा केल्या आहेत. राहुलने आतापर्यंत त्याच्या नावावर 17 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. ही मालिका राहुलसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.

उपकर्णधार रिषभ पंत (Rishbh Pant) 3000 कसोटी धावा पूर्ण करण्याच्या जवळ पोहोचला आहे. त्याला फक्त 52 धावांची गरज आहे. ही कामगिरी करताच पंत कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज म्हणून 3000 धावा पूर्ण करणारा दुसरा खेळाडू ठरेल. सध्या भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये 3000 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा रेकॉर्ड विकेटकीपर म्हणून धोनीच्या (Ms Dhoni) नावावर आहे. त्याने कसोटीमध्ये 4876 धावा केल्या आहेत, तसेच रिषभ पंत 3000 धावा करताच जगातील 18 वा यष्टीरक्षक फलंदाज ठरेल.

या मालिकेदरम्यान जसप्रीत बुमराहकडे (Jasprit Bumrah) सुद्धा विक्रम करण्याची संधी असेल. 2 विकेट घेताच बुमराह वसीम अक्रमचा महाविक्रम तोडून आशियातील सर्वात मोठा गोलंदाज ठरेल. (SENA) देशात सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा कारनामा करणाऱ्या गोलंदाजांमध्ये बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे. वसीम अक्रम दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये 146 विकेट्स घेतलेल्या आहेत. जसप्रीत बुमराह यामध्ये एका विकेटने दूर आहे. 2 विकेट घेताच बुमराह त्याचा विक्रम उध्वस्त करेल.

रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) नावावर 6691 आंतरराष्ट्रीय धावा आहेत. त्याच्याकडे 7000 धावा पूर्ण करण्याची संधी असेल. 309 धावा करताच जडेजा आंतरराष्ट्रीय मध्ये 7000 धावा करेल.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजकडे (Mohmmad Siraj) सुद्धा त्याच्या करिअरमध्ये एक खास कामगिरी करण्याची संधी आहे. सिराजकडे 200 आंतरराष्ट्रीय विकेट पूर्ण करण्याची संधी असणार आहे. ही कामगिरी करण्यासाठी त्याला 15 विकेट्सची गरज आहे. त्याने आतापर्यंत 96 सामन्यात 28.28 च्या सरासरीने 6/15 या सर्वश्रेष्ठ कामगिरी सोबत 185 विकेट घेतलेल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---