भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील तिसरा सामना संपल्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली. पण रेहितच्या या वक्तव्याशी भारतीय दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने अहसमती दर्शवली आहे. रोहितच्या मते त्याला सामन्याचा निकाल हवा आहे. तर दुसरीकडे हरभजन सिंगच्या मते मात्र खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल नसावी. गोलंदाजांनी विकेट घेण्यासाठी मेहनत करावी लागली पाहिजे, अहे हरभजन म्हणाला.
ऑस्ट्रेलियन संघाला या भारत दौऱ्यातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये दारून पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला, तर दुसरा सामना भारताने 6 विकेट्स राखून जिंकला. तिसरा कसोटी सामन्यात मात्र ऑस्ट्रेलियन फिरकीटूंच्या अप्रतिम प्रदर्शनामुळे भारताला पराभव मिळाला. विशेष म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या तिन्ही सामन्यांचा निकाल तिसऱ्या दिवशी लागला. इंदोर कसोटी गमावल्यानंतर खर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असलेली खेळपट्टी भारतासाठी भायदेशीर ठरली. पण तिसऱ्या कसोटी सामन्यात संघाची हीच रणनीती भारताला महागात पडली. भारतीय संघा या सामन्यात पहिल्या डावात 109, तर दुसऱ्या डावात 163 धावा केल्या. विजयासाठी ऑस्ट्रेलियाला 79 धावांची आवश्यकता होती, जे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने अवघ्या 19 षटकांमध्ये गाठले. रोहितने सामना संपल्यानंतर जी प्रतिक्रिया दिली, त्यावर हरभजन सिंग (Harbhajan Singh) मात्र सहमत नसल्याचे दिसते.
रोहितच्या वक्तव्याविषयी हरभजन म्हणाला, “चांगली गोष्ट आहे रोहित शर्माला निकाल हवा आहे. पण सामन्याचा निकाल अडीच दिवसांमध्येच येऊ नये. सामना पाचव्या दिवसापर्यंत खेळला गेला पाहिजे. खेळपट्टी अशी हवी जिथे विकेट घेताना गोलंदाजांना मेहनत करावी लागेल. याठिकाणी गोलंदाज मेहनत नाही मजुरी करत आहेत. फलंदाजांनी सर्व मेहनत का करावी. गोलंदाजांनी मेहनत करावी लागली पाहिजे.”
काय म्हणाला होता रोहित शर्मा
दरम्यान, तिसऱ्या कसोटीचा निकाल लागल्यानंतर रोहित माध्यमांसमोर आल्यावर त्याला खेळपट्टीविषयी प्रश्न विचारले गेले. या प्रश्नांना उत्तर देत रोहित म्हणाला की, “सामना अनिर्णित व्हावा आणि प्रेक्षकांना कंटाळवाणे वाटावे असे आम्हाला वाटत नाही. आम्हाला सामन्याचा निकाल हवा आहे. फलंदाजांना अशा खेळपट्टीवर खेळताना मेहनत करावी लागली पाहिजे, असेही वाटते.” रोहित म्हटल्याप्रमाणे खेळपट्टीवर धावा करण्यासाठी फलंदाजांना मेहनत घ्यावी लागली. पण भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाने या खेळपट्टीचा अधिक फायदा घेतला. ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात मॅथ्यू कुहनेमन याने पाच, तर दुसऱ्या डावात दिग्गज नाथन लायन याने 8 विकेट्स घेतल्या. परिणामी तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात भारतीय संघ पराभूत झाला. (Harbhajan Singh disagrees with Rohit sharma’s statement; He said, ‘The bowlers are working hard, not working’.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! संघाला टी20 वर्ल्डकपमध्ये घेऊन जाणाऱ्या कर्णधाराची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती
दिग्गजाने रोहितच्या नेतृत्वावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह! म्हणाला, “कर्णधार म्हणून तो कमी पडला”