भारतीय संघाचा माजी फलंदाज पार्थिव पटेलने 9 डिसेंबरला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आयपीएलचा तेरावा हंगाम संपल्यापासून एक विषय सतत चर्चेत आहे. तो म्हणजे, टी20 क्रिकेट प्रकारात भारतीय संघाचे नेतृत्त्व विराट कोहली ऐवजी रोहित शर्माला दिले जावे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल स्पर्धेत पाचवेळा विजेतेपद पटकावले आहे, तर विराटच्या नेतृत्वाखाली खेळताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने एकदाही विजेतेपद मिळवले नाही. यावर पार्थिव पटेलने आपले मत मांडले आहे.
रोहित शर्माला द्यावे नेतृत्व- पार्थिव पटेलचे मत
माध्यमांशी बोलताना पार्थिव पटेल म्हणाला, “रोहित शर्माने दाखवून दिले आहे की तो संघाला उभा करू शकतो. त्याने आपल्याला दाखवले आहे की, एक स्पर्धा कशी जिंकली जावू शकते. मला नाही वाटत की एका प्रकारातील नेतृत्त्व त्याला दिल्याने काही नुकसान होईल. उलट यामुळे विराट कोहलीवरील दबाव कमी होईल.”
पुढे बोलताना पार्थिव म्हणाला, “रोहित खूप स्पर्धा जिंकला आहे, आणि हे बघायला मजा येईल की तो दबावात कशाप्रकारे निर्णय घेतो. प्रत्येक हंगामात मुंबई इंडियन्स संघाकडे स्थिर संघ असत नाही, परंतु त्याने दाखवले की तो संघाला उभा करू शकतो आणि निकालही देऊ शकतो.”
रोहित संघ उभा करू शकतो
मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्त्व करताना रोहित शर्माचे विक्रम पाहून पार्थिव पटेलला वाटते की भारतीय टी20 संघाचे नेतृत्त्व रोहित शर्माकडे दिले जावे. पार्थिव म्हणाला, “माझ्या हिशोबाने जर टी20 विश्वचषक खेळण्यासाठी रोहित शर्मा तंदुरुस्त असेल, तर त्याला या स्पर्धेत भारतीय संघाचे कर्णधारपद द्यावे.”
“या वादात त्या दोघांमध्ये स्पर्धा सुरू झाली नाही पाहिजे. आपण याबद्दल अशासाठी बोलत आहोत, कारण भारताकडे नेतृत्त्वाचे पर्याय उपलब्ध आहेत. जर पर्याय उपलब्ध नसते, तर ही तुलना झाली नसती,” असेही पार्थिव पुढे बोलताना म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल १० खेळाडू कसोटी मालिकेपूर्वी परतणार भारतात, पाहा संपूर्ण यादी
विराट! शेतकरी मोर्चात सहभागी हो, चिडून चाहत्याने केले आवाहन
ट्रेंडिंग लेख-
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ
अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’
अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेल खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात