दिग्गज क्रिकेटर रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) आता क्रिकेटचा किंग विराट कोहलीही (Virat Kohli) कसोटी क्रिकेटला अलविदा म्हणू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबतची माहिती बीसीसीआयला दिली आहे. जर कोहली इंग्लंड दौऱ्यापूर्वी निवृत्त झाला तर कसोटी संघातील चौथ्या क्रमांकाचे स्थान रिक्त होईल. अशा परिस्थितीत विराट कोहलीच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळेल. आता या प्रश्नावर चर्चा होऊ लागल्या आहेत. पण, प्रथम श्रेणीत आपली कामगिरी सिद्ध करणाऱ्या स्टार फलंदाजाला विराटच्या जागी संधी मिळू शकते.
या महत्त्वाच्या पदासाठी, निवडकर्ते श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पुन्हा संघात समाविष्ट करू शकतात, जो सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अय्यरने 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती, त्यानंतर त्याला बीसीसीआयच्या (BCCI) केंद्रीय करार यादीतून वगळण्यात आले होते. परंतु उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे त्याला पुन्हा करार मिळाला.
श्रेयस अय्यरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये (Duleep Trophy) त्याने 3 डावांमध्ये 154 धावा आणि रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) 5 सामन्यांमध्ये 68.5च्या सरासरीने 2 शतकांसह 480 धावा केल्या आहेत.
अय्यरने 2021 मध्ये कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 14 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने 36.86च्या सरासरीने एकूण 811 धावा केल्या आहेत, ज्यात 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. पण, अय्यरकडे कोहलीपेक्षा कमी अनुभव आहे. चौथ्या क्रमांकावर कोहलीची सरासरी सुमारे 50 आहे. अय्यरने आतापर्यंत या स्थानावर फक्त एकच कसोटी खेळली आहे. असे असूनही, अय्यरचा अलीकडील फॉर्म पाहता, त्याला चौथ्या क्रमांकाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
🚨 TALKS ON WITH VIRAT KOHLI. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 10, 2025
– A highly influential person in Indian cricket expected to meet Virat to persuade him to continue in Tests. (Cricbuzz). pic.twitter.com/Y42JsURshX