भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सध्या टी-20 सामन्यांची मालिका चालू आहे. ही मालिका येणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी शेवटची असल्याने महत्वाची देखील आहे. सर्व खेळाडू यात चांगली कामगिरी करून संघात आपला दावा ठोकण्यास प्रयत्नशील आहेत. भारतीय संघ 2-0 ने आघाडीवर असून मालिकेचा शेवट गोड करण्याचा संघाचा प्रयत्न असेल.
युवा खेळाडूंनी मारलीय बाजी
कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) आणि विराट कोहली(Virat Kohli) यांच्या टी-20 क्रिकेटमधील पुनरागमनाने मालिकेबाबात उत्सुकता होती. पण, ही मालिका खऱ्या अर्थाने गाजवली युवा खेळाडूंनी. विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्सचा हिटर शिवम दुबेने(Shivam Dube) जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये सलग अर्धशतके लगावलेली आहेत. यात काही उत्तुंग षटकारांचा देखील समावेश आहे. 170 च्या स्ट्राइक रेटने केलेल्या 123 धावांसह त्याने 2 विकेट्स ही घेतल्या आहेत. तसेच, यशस्वी जयसवाल, अक्षर पटेल आणि रिंकू सिंग(Rinku Singh) यांनीही सर्वांना प्रभावित केले आहे. आता यातील कोणाला विश्वचषकातील अंतिम संघात स्थान मिळेल हे पाहावे लागेल. (India vs Afghanistan, 3rd T20I: Final opportunity for Rohit)
‘सिनियर’ खेळाडूंचे काय?
युवा खेळाडूंनी तर भेटलेल्या संधीचे सोने केले आहे. पण सिनियर खेळाडूंचे काय? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. रोहित आणि विराट कोहली यांनी 14 महिन्यांनंतर टी-20 क्रिकेट मध्ये आपले पुनरागमन केले आहे. विराट मालिकेत एकच सामना खेळला असून, त्यात त्याने 16 बॉल 29 धावांची आक्रमक खेळी करत आपला प्रभाव पाडला. रोहित साठी मात्र ही मालिका अत्यंत खराब राहिली आहे. दोन डावांत त्याला एकही धाव काढता आली नाही. त्यामुळे तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात चांगले प्रदर्शन करण्याचा दबाव त्याच्यावर असेल. दुसरीकडे, अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांना या मालिकेतून ब्रेक दिला गेला होता. तर हार्दिक पंड्या अजूनही दूखापतीतून सावरत आहे. त्यामुळे या सर्वांना येणाऱ्या आयपीएल मधून स्वतःला सिद्ध करावेच लागेल.
कधी आणि कुठे होइल सामना
सामना बंगरूळूच्या चिन्नास्वामी स्टेडियम वर, सायंकाळी 7 वाजता चालू होणार आहे. तर हा सामना आपल्याला जिओ सिनेमावर मोफत पाहता येईल.
वाचा आणखी महत्वाच्या बातम्या –
‘आम्ही रोज तुमचीआठवण काढतो’; वडिलांच्या पुण्यतिथीदिनी हार्दिक-क्रुणाल भावूक, शेअर केली खास पोस्ट
Gujarat Titans । संघाला फरक पडत नाही! हार्दिक पंड्याबाबत मोहम्मद शमीचे मोठे विधान