---Advertisement---

अश्विन-जडेजाशिवाय भारत शेवटचा कधी खेळला? गेल्या 10 वर्षात 5व्यांदा असं घडलं

On: शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024 9:08 AM
Ravichandran Ashwin Ravindra Jadeja
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कर्णधाराने प्लेइंग इलेव्हनची घोषणा करताच सर्वजण थक्क झाले. वास्तविक, चाहत्यांना पर्थ कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आर अश्विन-रवींद्र जडेजा यांचे नाव दिसले नाही. या कसोटीत वॉशिंग्टन सुंदर टीम इंडियाचा एकमेव फिरकी गोलंदाज असेल. अशा परिस्थितीत या दिग्गज जोडीशिवाय भारत शेवटचा सामना कधी खेळला, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होऊ लागला. तर तुमच्या माहितीसाठी, गेल्या 10 वर्षात ही 5वी घटना घडली आहे. तर ऑस्ट्रेलियातील ही चौथी वेळ आहे.

होय, अश्विन आणि जडेजा यांच्या जोडीशिवाय भारत शेवटच्या वेळी 2021 मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेट खेळला होता. त्यावेळी हे दोन्ही फिरकीपटू जखमी झाले होते.

गेल्या 10 वर्षातील रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर ही केवळ 5 वी वेळ आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीपूर्वी भारताने अश्विन-जडेजाशिवाय 2014 मध्ये ॲडलेड, 2018 मध्ये पर्थ आणि 2021 मध्ये ब्रिस्बेनमध्ये खेळले होते. याशिवाय भारत 2018 मध्ये जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जडेजा-अश्विनशिवाय खेळला होता.

गेल्या 10 वर्षांत अश्विन-जडेजाशिवाय भारत किती वेळा खेळला?

विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ॲडलेड (2014, पराभव)

विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग (2018, जिंकले)

विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पर्थ (2018, पराभव)

विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन (2021, जिंकले)

विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पर्थ (2024)*

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पर्थ कसोटीत भारताच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाल्यास, दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली आहे. नितीशकुमार रेड्डी संघात अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत तर हर्षित राणा वेगवान गोलंदाजाच्या भूमिकेत दिसणार आहे. विराट कोहलीने पदार्पणाची कॅप नितीशला दिली आणि आर अश्विनने हर्षितला दिली.

भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज

हेही वाचा-

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियासाठी स्टार खेळाडूंचे पदार्पण, कोहली-अश्विनने दिली कॅप
IND VS AUS; टीम इंडियाचा टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय, या दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी रवी शास्त्रींचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “पुजारा सारखा फलंदाज…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---