मोहालीच्या एयएस बिंद्रा स्टेडियवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना खेळला गेला. मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने बाजी मारली. भारताला 4 विकेट्सच्या अंतराने पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नाथन एलिस याने मोहालीत खेळताना टाकलेल्या चार षटकांमध्ये 30 धावा दिल्या आणि सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
भारतीय संघाचे प्रमुख फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि दनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांच्यासह अक्षर पटेलला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. नाथन एलिस (Nathan Ellis) अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवखा आहे. पण त्याला मिळालेल्या संधीचा त्याने पूर्ण फायदा उचलला आहे. मिचेल स्टार्क दुखापतीमुळे भारत दौऱ्यात सहभागी होऊ शकला नाहीये. त्याच्या जागी नाथन एलिसला संधी दिली गेली आणि तो या विश्वासास पात्र देखील ठरला आहे. एलिसचा इथपर्यंतचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे.
नाथन एलिस क्रिकेटपटू बनण्याआधी रोजंदारीची कामे करत असायचा. पोटापाण्याची सोय करण्यासाठी त्याला स्वतःचे घर देखील सोडावे लागले होते. त्याने खड्डे खांदण्याचे काम देखील केले आहे. तसेच कंस्ट्रक्शन साइटवर देखील कामाचा अनुभव त्याला आहे. एलिस 22 वर्षाचा असताना न्यू साउथ वेल्समधून एस्मानियाला आला होता. त्याच्याकडे कोणतीही नोकरी नव्हती. तसेच एखादे कॉन्ट्रॅक्ट देखील नव्हते. परंतु त्याला क्रिकेटमध्ये काहीतरी करण्याची इच्छा मात्र नक्कीच होती.
एलिसने त्याचे खर्च आणि बिल भरण्यासाठी दरम्यानच्या काळात 5-6 नोकऱ्या केल्या. खड्डे खांदण्याचे काम करत असताना त्याला शनिवारी सुट्टी मिळत नसल्यामुळे त्याने हे काम सोडले. शनिवारी त्याला क्रिकेट खेळायचे असल्यामुळे त्याने असा निर्णय घेतला होता. याच कारणास्तव त्याने कंस्ट्रक्शन साइटवरचे काम देखील सोडले होते. त्याने वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडसाठी वर्गनी गोळा करण्याची नोकरी देखील केली. ही नोकरी म्हणजे त्याच्या अयुष्यातील सर्वात खराब काम होते, असेही त्याने सांगितले होते.
या संघटनेसोबत काम करताना त्याला अनेकांच्या दारात जावे लागत होते आणि लोकांकडून मिळणारा अपमान देखील सहन करावा लागत असायचा. त्यानंतर त्याला एका शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली, जी त्याच्यासाठी अगदी सोईक्सर होती, कारण त्याला शनिवार आणि रविवारी क्रिकेट खेळण्यासाठी वेळ मिळाली होती. एलिसने तस्मानिया संघासाठी दोन हंगाम खेळले, पण ग्रेड लेवल क्रिकेटच्या पुढे जाऊ शकला नाही.
दोन वर्षात काहीच साध्य होत नसल्यामुळे एलिस निराश झाला होता. अशात तस्मानिया सोडण्याचा विचार त्याने केला होता. परंतु, संघाचे मुख्य प्रशिक्षक एडम ग्रिफिथ यांनी त्याला एक हंगाम अजून खेळण्यासाठी आग्रह केला आणि त्याने हा हंगाम खेळला देखील. याच हंगामात त्याच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. एलिसने मागच्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी टी-20 पदार्पण केले. या सामन्यात त्याने विकेट्सची हॅट्रिक घेतली आणि विश्वविक्रम देखील नोंदवला. भारताविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात देखील त्याचे प्रदर्शन सर्वात्तम होते. त्याने आतापर्यंत एकूण 4 टी-20 सामने खेळले आहेत आणि यामध्ये 12 विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सूर्याच्या फटकेबाजीने पाकिस्तानचा अहंकार मोडला! खास यादीत बाबर आझमला टाकले मागे
पुन्हा बदलले गेले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे ठिकाण! लॉर्ड्स नव्हेतर या मैदानावर होणार सामना
‘चहलला बाहेर काढा’ सोशल मीडियावर चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी