भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने झाले आहेत. या दोन्ही सामन्यांत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाने प्रत्येकी एक सामना जिंकून मालिकेत बरोबरी केली. मात्र भारतीय फलंदाज मयंक अगरवाल या दोन्ही सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला आहे. त्याच्या या अपयशा बद्दल सुनील गावसकर यांनी त्याच्या फलंदाजीतील त्रुटी सांगत सल्ला दिला आहे.
मयंकने चार डावात फलंदाजी करताना अनुक्रमे 17, 9, 0 आणि 5 धावा केल्या आहेत. त्यामुळे तिसर्या सामन्यात भारतीय संघातून त्याला वगळून रोहित शर्माला संधी मिळू शकते. त्याचबरोबर इतर काही बदल केले जाऊ शकतात.
मयंक अगरवाल ऑस्ट्रेलिया दौऱ्यात का अपयशी ठरत आहे. याबद्दल बोलताना गावसकर म्हणाले, “त्याचा नवीन स्टान्समध्ये तो (फलंदाजीसाठी उभी राहण्याची पद्धत) मागील पायावर खूप कमी पर्याय देत आहे. ही गोष्ट त्याला आतील हालचाल करताना डाव्या हाताच्या गोलंदाजा विरुद्ध खेळताना मदत करू शकते. त्याचबरोबर त्याच्या पायामध्ये मोठी पोकळी निर्माण होते, ज्यामुळे तो सातत्याने अपयशी ठरत आहे.”
गावसकर मयंकला सल्ला देताना म्हणाले,” त्याने आपल्या स्टान्सला ओपन करावे आणि यामुळे तो आपली आतील हालचाल कवर करू शकेल.”
त्याचबरोबर दीपदास गुप्ता यांनीही मयंक अगरवालला त्याच्या स्टान्समध्ये बदल करण्याचा सल्ला दिला आहे. दीपदास गुप्ता म्हणाले,” माझ्यासोबत सुद्धा असे झाले आहे. त्यामुळे याच्यावर काम करून ते व्यवस्थित करता येवू शकते. जर तो आपल्या मनगटाला जवळ आणले, तर तो चेंडूजवळ पटकन येवू शकतो.”
दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये चार बदल केले होते. त्याचबरोबर भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीच्या जागी अजिंक्य रहाणेने केले होते. त्यामुळे तिसर्या सामन्यात सुद्धा बदल केले जाऊ शकतात. ज्यामधे रोहित शर्माला संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
…तरीही रोहित शर्मा, रिषभ पंत आणि शुबमन गिल सिडनी कसोटीत खेळणार
मेलबर्न येथे होणारे भारतीय संघाचे सराव सत्र ‘या’ कारणामुळे झाले रद्द
संधी सोडायची नाय! सिडनी कसोटीसाठी नटराजन करतोय कसून सराव, पाहा व्हिडिओ