---Advertisement---

IND vs BAN : भारताने आशिया कपमध्ये विजय मिळवून मोडला श्रीलंकेचा विक्रम

On: गुरूवार, सप्टेंबर 25, 2025 9:14 AM
---Advertisement---

दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यात भारताने बांग्लादेशवर 41 धावांनी मात केली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या विजयासह सुपर-4 टप्प्यातील अजून एक सामना बाकी ठेवत थेट अंतिम फेरीत धडक दिली आहे. 26 सप्टेंबरला भारताचा सामना श्रीलंकेशी होणार आहे.

भारतीय संघाने या विजयासह आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा संघ बनण्याचा मान पटकावला आहे. आतापर्यंत भारताने 70 सामने खेळले असून त्यापैकी 48 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यामुळे त्यांनी श्रीलंकेचा विक्रम मागे टाकला आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेश अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.

संघविजय
भारत48
श्रीलंका47
पाकिस्तान36
बांग्लादेश15

आता अंतिम फेरीत भारताची भिडंत पाकिस्तान किंवा बांग्लादेश यांच्याशी होऊ शकते. 25 सप्टेंबरला या दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार असून विजेता थेट 28 सप्टेंबरला भारताशी किताबासाठी झुंज देईल. विशेष म्हणजे, आशिया कपच्या इतिहासात आजवर कधीही भारत-पाकिस्तान अंतिम सामना झालेला नाही.

भारतीय संघाची लय आणि खेळाडूंची कामगिरी पाहता चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. विशेषतः युवा खेळाडूंच्या जोरदार फलंदाजी आणि गोलंदाजीने संघाला आत्मविश्वास दिला आहे. त्यामुळे या वेळचा आशिया कप भारतासाठी ऐतिहासिक ठरू शकतो, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---