---Advertisement---

IND Vs ENG : रांचीची खेळपट्टी पाहून इंग्लंडचा कर्णधार गेला गोंधळून; म्हणाला,’मी आजपर्यंत…

Ben-Stokes
---Advertisement---

IND Vs ENG : भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. तर या 5 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना हा टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या रांचीत होणार आहे. या सामन्याला 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला चौथा सामना जिंकून मालिका विजयाची संधी असणार आहे.

याबरोबरच, यावेळी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने रांचीच्या खेळपट्टीची पाहणी केली तेव्हा तो गोंधळून गेला आहे. तसेच स्टोक्सशिवाय इंग्लंडच्या ऑली पोपनेही रांचीची खेळपट्टी पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. तर खेळपट्टीबाबत स्टोक्स म्हणाला आहे की, मी आजपर्यंत अशी खेळपट्टी पाहिली नाही. याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

https://twitter.com/sujeetsuman1991/status/1760166932425359500

भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याची खेळपट्टी पाहिल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला आहे की, मी आजपर्यंत अशी खेळपट्टी पाहिली नव्हती. या खेळपट्टीची खास गोष्ट म्हणजे दुरून पाहिल्यावर ती हिरवीगार दिसते, पण जवळ जाऊन पाहिलं तर त्यात अनेक भेगा असलेल्या दिसत आहेत. तसेच या मैदानावर फलंदाजी करणे खूप कठीण होणार आहे. याबरोबरच मला खेळपट्टीबद्दल काय बोलावे ते कळत नसून खेळपट्टी कशा प्रकारची आहे हे देखील मला सांगता येणार नाही.

तसेच इंग्लंडचा उपकर्णधार ऑली पोप याने या खेळपट्टीबद्दल म्हंटला आहे की, मैदानाच्या एका बाजूची विकेट खूपच खराब आहे, तर दुसऱ्या बाजूची विकेट थोडी छान दिसते. पण भारतीय संघ कसा खेळतो यानंतरच आम्ही पुढील निर्णय घेऊ. तसेच या मैदानावर करिष्माई गोलंदाजी होणार असल्याचे स्टोक्स आणि पोप यांच्या वक्तव्यावरून सध्या तरी चित्र स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने आघाडी घेतली आहे. तर मालिकेतील आतापर्यंत 3 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये पहिला सामना इंग्लंडच्या नावावर होता. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणममध्ये खेळला गेला, जो भारताने जिंकला होता. तसेच राजकोटच्या मैदानावर मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला, या सामन्यातही भारताने ऐतिहासिक विजय मिळवला होता. आता मालिकेतील चौथा सामना रांचीमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे सगळ्याचे सक्ष या सामन्याकडे लागले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---