इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी धावांचा पाऊस पडला. भारताच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी केली ज्यात पहिल्या दिवशी 3 गडी गमावून 359 धावा केल्या. इंग्लंडचे गोलंदाज विकेट घेण्यासाठी संघर्ष करताना दिसले आणि ते पूर्णपणे बॅकफूटवर दिसत होते. आता चाहत्यांच्या नजरा कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खिळल्या आहेत. पण हवामान अहवालावर विश्वास ठेवायचा झाला तर दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान लीड्समध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. त्यावेळी इंग्लंडमध्ये सकाळी 11 वाजतील. अॅक्युवेदरच्या अहवालानुसार, 21 जून रोजी सकाळी लीड्समध्ये पावसाची शक्यता 5% आहे. जसजसा खेळ पुढे सरकेल तसतसे पावसाची शक्यता वाढत जाईल. लीड्समध्ये दुपारी 2 ते संध्याकाळपर्यंत पावसाची 73% शक्यता आहे. याचा अर्थ असा की पावसामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात व्यत्यय येऊ शकतो. आता दुसऱ्या दिवशी किती षटकांचा खेळ खेळवता येईल हे काळच सांगेल.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, भारताकडून पहिल्या दिवशी दोन फलंदाजांनी शतके ठोकली. सर्वप्रथम, यशस्वी जयस्वालने शतक झळकावले. त्याने सलामी देताना 159 चेंडूत 101 धावा केल्या. कर्णधार शुबमन गिलनेही शानदार खेळी केली. 175 चेंडूत 127 धावा करून तो अजूनही क्रीजवर नाबाद आहे. रिषभ पंतही 65 धावा करून नाबाद परतला. आता दुसऱ्या दिवशी, पंत या धावसंख्येचे शतकी खेळीत रूपांतर करू इच्छितो.
इंग्लंडच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांचे सर्व गोलंदाज भारतीय फलंदाजांसमोर असहाय्य दिसत होते. सर्वात यशस्वी गोलंदाज कर्णधार बेन स्टोक्स होता. त्याने 13 षटकात 43 धावा देऊन 20 बळी घेतले. त्याच्याशिवाय ब्रायडन कार्सला एक विकेट मिळाली. इतर सर्व गोलंदाज धावा देताना दिसले. आता अशा परिस्थितीत, इंग्लिश गोलंदाज दुसऱ्या दिवशी जोरदार पुनरागमन करू इच्छितात
्






