भारतीय क्रिकेटला २०१६ साली एक गुणवंत फिरकी गोलंदाज मिळाला. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. परंतु या गोलंदाजाला अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाहीये. हा गोलंदाज दुसरा कोणी नसून युझवेंद्र चहल आहे. चहलला आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या ६ वर्षांनंतर देखील कसोटी संघात संधी मिळाली नसल्यामुळे इंग्लंडचा माजी दिग्गज ग्रीम स्वानने नाराजी व्यक्त केली.
एक वृत्तसंस्थेशी बोलताना इंग्लंडचा माजी वेगवाग गोलंदाज ग्रीम स्वान (Graeme Swann) म्हणाला की, “जर मी निवडकर्ता असतो, तर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याला विचारले असते की, त्याला कसोटी खेळायची आहे की नाही? जर त्याने हो उत्तर दिले असते, तर मी त्याला संघात संधी दिली असती. माझ्या दृष्टीने तो विश्वस्तरीय आणि सध्या जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे. परिस्थिती प्रतिकूल असली तरी, त्याच्याकडून भारतीय संघासाठी अप्रतिम लेग स्पिन गोलंदाजी पाहायला मिळते. ही कामगिरी अविश्वसनीय आहे.”
स्वान पुढे म्हणाला की, “मी असे म्हणू शकतो की वर्तमानात युझी सर्वोत्तम व्हाईट बॉल स्पिनर आहे, पण माहिती नाही कसोटीत तो सर्वोत्तम योगदान देऊ शकेल की नाही? सध्या काही क्रिकेटपटूंना व्हाईट बॉल स्पेशलिस्ट म्हटले जाते, परंतु त्यांना कसोटी क्रिकेटमध्येही संधी मिळाली पाहिजे. आजच्या युगात कसोटी क्रिकेट खूप बदलले आहे. तुम्हा पाहू शकता इंग्लंड कशा पद्धतीने खेळत आहे. ब्रँडन मॅक्युलम आल्यानंतर संघ आक्रमक झाला आहे. आता ते भारत आणि जगातील कोणत्याही संघाला पराभूत करू शकतात. अशाच पद्धतीने लोकं कसोटी क्रिकेटकडे पुन्हा एकदा वळतील.”
युझवेंद्र चहलच्या कारकिर्दीचा विचार केला, तर २०१३ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पुढचे तीन वर्षांनंतर त्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि भारतीय संघाचे तिकिट कापले. २०१६ मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. चहलच्या नावावर आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६१ सामन्यांमध्ये १०४ विकेट्स आहेत. खेळलेल्या ६० टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये त्याने ७५, तर आयपीएलच्या १३१ सामन्यांमध्ये १६६ विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बिग ब्रेकिंग! इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ओएन मॉर्गन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
तब्बल ९२ वर्षानंतर घडला इतिहास; डॅरिल मिचेलने केली ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी
२००७नंतर भारताचे जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार, बेन स्टोक्सने केला विश्वास व्यक्त





