नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीला दुखापत झाली. कोहलीऐवजी संघात यशस्वी जयस्वालचा समावेश करण्यात आला. ज्याने गोलंदाजी करणारा अष्टपैलू हर्षित राणासह एकदिवसीय पदार्पण केले. सामन्याच्या आदल्या रात्री कोहलीच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे रोहित शर्माने टॉसच्या वेळी सांगितले.
कोहलीच्या अनुपस्थितीत, यशस्वीने कर्णधार रोहित शर्मासह भारतासाठी डावाची सुरुवात केली. शुबमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले आणि दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाल्यानंतर त्याने भारताच्या धावांचा पाठलाग करताना शानदार फलंदाजी केली आणि 96 चेंडूत 87 धावा केल्या. गिलसह, श्रेयस अय्यर (36 चेंडूत 59) आणि अक्षर पटेल (47 चेंडूत 52) यांनीही महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या. भारताला धावांचा पाठलाग करताना कोहलीची अनुपस्थिती जाणवली नाही आणि नागपूरमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
कटकमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारताचा उपकर्णधार शुबमन गिलने विराट कोहलीच्या दुखापतीबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. सामन्यानंतर प्रसारकाशी बोलताना गिलने सांगितले की, कोहलीबद्दल काळजी करण्याचे काही कारण नाही आणि तो पुढील सामन्यासाठी तंदुरुस्त असेल. कालच्या सराव सत्रापर्यंत तो ठीक होता. काळजी करण्याचे काही कारण नाही. तो पुढील सामन्यासाठी निश्चितच तंदुरुस्त होईल.
🚨 VIRAT KOHLI WILL PLAY SECOND ODI 🚨
– It doesn’t seem that bad though, Virat Kohli will play the 2nd ODI match at Cuttack in all likelihood. [TOI] pic.twitter.com/AsSGmA3cLh
— Johns. (@CricCrazyJohns) February 7, 2025
36 वर्षीय कोहली या फॉरमॅटमध्ये 14000 धावा पूर्ण करणारा तिसरा फलंदाज बनण्यापासून फक्त 94 धावा दूर आहे. यापूर्वी फक्त सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांनीच हे काम केले आहे. परंतु कोहलीकडे सर्वात जलद हा टप्पा गाठण्याची सुवर्णसंधी आहे.
हेही वाचा-
रोहितचा एक कॉल आणि नवा ट्विस्ट, श्रेयस अय्यरच्या निवडीमागचं नाट्य उघड!
सामन्यानंतर रोहित शर्माचं कडवटं मत, भारताचा विजय महत्त्वाचा, पण…
“हुकलेला पुल, हरवलेली लय”, रोहित शर्माच्या पुनरागमनाची वाट पाहतोय भारत!