---Advertisement---

शिखरही नाही अन् राहुल त्रिपाठीही नाही, चांगल्या प्रदर्शनानंतरही टीम इंडियात संधी न दिल्याने चाहते संतापले

---Advertisement---

बीसीसीआयने रविवारी (२२ मे) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. पाच सामन्यांची ही मालिका भारतात खेळली जाणार आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती दिली गेली आहे, तर आयपीएल २०२२ गाजवणाऱ्या काही युवा खेळाडूंना संघात सहभागी केले गेले आहेत. पण, शिखर धवन आणि राहुल त्रिपाठी या दोघांनी आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केले, मात्र त्यांना संघात निवडले गेले नाही. याच कारणास्तव चाहते संताप व्यक्त करत आहेत.

अनकॅप्ड खेळाडू राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला. त्याने खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये ३७.५५ च्या सरासरीने ४१३ धावा केल्या आहेत. तसेच शिखर धवन (Shikhar Dhawan) याने १४ सामन्यात ३८.३३ च्या सरासरीने ४६० धावा केल्या आहेत. धवन आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत ६ व्या क्रमांकावर आहे. त्याव्यतिरिक्त या हंगामात आतापर्यंत ४०३ धावा करणाऱ्या शुबमन गिलला देखील भारतीय टी२० संघात संधी मिळालेली नाहीये.

चाहत्यांनी सर्वाधिक निराशा राहुल त्रिपाठीसाठी व्यक्त आहे. त्रिपाठीने देशांतर्गत आणि आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. चाहत्यांच्या मते अशा खेळाडूंना संधी न देऊन भारतीय संघ गुणवत्ता वायाला घालवत आहे.

https://twitter.com/harbhajan_singh/status/1528369889609515008

https://twitter.com/RockstarMK11/status/1528356856585809920

https://twitter.com/ShikharTheOne/status/1528369288779706368

https://twitter.com/Fukkard/status/1528364605407481857

https://twitter.com/Puneite_/status/1528350892080386048

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या टी-२० मालिकेदरम्यान, रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या दिग्गजांना विश्रांती दिली गेली आहे. रोहितच्या जागी केएल राहुल कर्णधाराची भूमिका पार पाडेल. अष्टपैलू हार्दिक पंड्या मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन करत आहे. तसेच समालोचकाच्या भूमिकेत दिसणारा दिनेश कार्तिक देखील संघात पुनरागमन करत आहे. आयपीएलच्या चालू हंगामात कार्तिकचे प्रदर्शन पाहून प्रत्येकजण हैराण झाला होता.

पंजाब किंग्जचा युवा गोवंदाज अर्शदीप सिंग आणि सनरायझर्स हैदराबादचा युवा गोलंदाज उमरान मलिक या दोघांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवडले गेले आहे. उमरानने त्याच्या गतीने सर्वांना हैराण केले आहेत, तर अर्शदीप शेवटच्या षटकांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करू शकतो. आगामी मालिकेत या दोघांना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---