भारतीय संघाचा कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) युवा खेळाडूंना संघात संधी दिली आहे. आयपीएल आणि देशांतर्गत स्पर्धामध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना संघात संधी देण्याबरोबरच जुन्या खेळाडूंना संघातून ब्रेक दिला जात आहे. सध्या काही खेळाडू दुखापतींमुळे संघाचा भाग नाहीयेत. केएल राहुल सुद्धा दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. रोहितच्या योजनेनुसार केएल राहुलला (KL Rahul) इशान किशन (Ishan Kishan) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) खेळाडूंमुळे धोका आहे.
नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेत भारतीय कर्णधार रोहित शर्माने युवा खेळाडूंना खेळण्याची संधी दिली. या युवा खेळाडूंना त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी किंवा हे खेळाडू संघात फिट होतात की नाही, याचा शोध घेण्यासाठी पुरेशी संधी मिळू शकली नाही. वेस्ट इंडिजला मायदेशात पराभूत केल्यानंतर भारतीय संघ २४ फेब्रुवारीपासून श्रीलंकेविरुद्ध ३ सामन्यांच्या टी२० मालिका खेळणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या टी२० सामन्यात रोहित शर्माने नवीन काही करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याऐवजी केएल राहुल, इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड या युवा खेळाडूंना सलामीला पाठवले. हा प्रयोग फसला असला, तरीसुद्धा भारतीय कर्णधाराने ही योजना पुढे नेण्याची तयारी केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत भारतीय संघ आपल्या नव्या सलामीवीरासह मैदानात उतरू शकतो. रोहित शर्माच्या योजनेमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. या सामन्यात इशान आणि ऋतुराज ही सलामीवीर जोडी गेली, तर केएल राहुलसाठी अडचण येऊ शकते. इशान किशनला मिळत असलेल्या संधींचा फायदा उठवता येत नाही, पण आता रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी या दोघांसाठी काही मोठ्या योजना बनवल्या आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात रोहित मधल्या फळीत फलंदाजीसाठी आला होता. तरुणांना सतत संधी देणार असल्याचे रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा विश्वास आहे की, तंदुरुस्त खेळाडूंसाठी संघांचे दरवाजे खुले आहेत. मात्र, तंदुरुस्त नसलेल्या खेळाडूंसाठी कोणताही धोका पत्करला जाणार नाही. सतत दुखापत होत असलेला केएल राहुल संघासाठी वाईट बाब ठरू शकतो. त्यादृष्टीने इशान आणि ऋतुराज यांना सलामीला पाठवले जाऊ शकते आणि कर्णधार रोहितला मधल्या फळीत प्रवेश मिळू शकतो.
याशिवाय केएल राहुल जेव्हा संघात येतो, तेव्हा तो ऋतुराजसोबत सलामी करताना मधल्या फळीतील सलामीवीर फलंदाजाला सलामी देऊ शकतो. संधी मिळाल्यावर ऋतुराजला फारसे यश मिळाले नाही, पण तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुवर्ण टप्प्यात आहे. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळाल्यानंतरही देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो शानदार कामगिरी करत आहे. अशा स्थितीत तो सलामीवीर म्हणून यशस्वी ठरल्यास केएल राहुलसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या –
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात ‘हिटमॅन’ला मोठा विक्रम करण्याची संधी; फक्त १२ षटकार दूर
‘मास्टर ब्लास्टर’चे सोशल मीडियावरून आवाहन; म्हणाला, ‘कधीच दारू, जुगार अन् तंबाखूची…’
जेव्हा भेटले दोन ‘खिलाडी’…! सोशल मीडियावर व्हायरल होतोय एमएस धोनी आणि अक्षय कुमारचा फोटो