भारत आणि श्रीलंका (IND vs SL T20 Series) यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका रविवारी संपली. मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. मालिकेतील एकही सामना न गमावल्यामुळे भारतीय संघ श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्यात यशस्वी राहिला. मालिकेत भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने जबरदस्त प्रदर्शन केले आणि तिन्ही सामन्यांमध्ये नाबाद राहिला. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर देखील तो ट्रेंडमध्ये आहे.
भारतीय संघासाठी श्रेयस अय्यरने सलग तिसऱ्यांदा दमदार प्रदर्शन केले आणि विजय मिळवून दिला. टी-२० मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये तो नाबाद राहिला आणि तिन्हीमध्ये अर्धशतकी खेळी केली. शेवटच्या टी-२० सामन्यात त्याने ४५ चेंडूत ७३ धावा केल्या आणि श्रीलंकन गोलंदाजांची अवस्था बिकट केली. तत्पूर्वी पहिल्या आणि दुसऱ्या टी-२० सामन्यायत श्रेयसने अनुक्रमे नाबाद ५७ आणि ७४ धावा ठोकल्या होत्या. मालिकेत त्याने एकूण २०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याचे हे प्रदर्शन पाहून चाहतेही खूप खुश असल्याचे पाहायला मिळत आहेत. ट्वीटरवर त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
10 RUPAYE KI PEPSI,SHREYAS IYER SEXY💃💃#INDvSL #T20 #Dharamshala pic.twitter.com/dptXSqz1xP
— TV SERIAL STORY LINE (@RAJPUT9989) February 27, 2022
#INDvSL #ShreyasIyer #TeamIndia
Shreyas Iyer Be like: pic.twitter.com/9sm9GfRtWs— Dev (@MSDIAN___DEV) February 27, 2022
Iyer. Shreyas Iyer. Shreyas now all format player Iyer. https://t.co/vJG9uKTdkx
— Ajitdeep (@CHAIHOLIC_) February 27, 2022
Shreyas Iyer Avg – ∞#INDvSL pic.twitter.com/sD3WdJSRkX
— Shivani (@meme_ki_diwani) February 27, 2022
https://twitter.com/idle__student/status/1498168512778358787
57*(28) | 74*(44) | 73*(45) 🔥
Bowlers to Shreyas in #INDvSL series: pic.twitter.com/1lPq7WKwAo
— KolkataKnightRiders (@KKRiders) February 27, 2022
Shreyas Iyer#INDvSL #ShreyasIyer pic.twitter.com/5RzxjOx4Rk
— व्लादीमीर प्रोटीन 🍻💣 (@vladimirProtien) February 27, 2022
#INDvSL Shreyas Iyer 🤲 pic.twitter.com/Ayr2DCUMfp
— Sudhanshu Ranjan Singh (@memegineers_) February 27, 2022
https://twitter.com/beingaryan95/status/1497979042951479305
दरम्यान, मालिकेतील शेवटच्या सामन्याचा विचार केला, तर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी ५ विकेट्सच्या नुकसानावर १४६ धावा केल्या आणि विजयासाठी भारतासमोर १४७ धावांचे लक्ष ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने चार विकेट्सच्या नुकसानावर सोपा विजय मिळवला. सामना एकतरफी झाला, पण भारताची सलामीवीर जोडी पुन्हा एकदा अपयशी ठरली.
ईशान किशन मालिकेतील तिसऱ्या सामन्यात अनुपस्थितीत असल्यामुळ रोहित शर्मा आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात केली. रोहितने अवघ्या ५ धावा करून विकेट गमावली, तर संजूने १८ धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर श्रेयसला खेळण्याची संधी मिळाली आणि तो पुन्हा एकदा विश्वासास पात्र ठरला. त्याने केलेल्या ७३ धावांमध्ये ९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याव्यतिरिक्त एकही भारतीय फलंदाज अर्धशतकी खेळी करू शकला नाही. दुसरीकडे श्रीलंकेसाठी कर्णधार दासून शनाकाने पुन्हा एकचा चांगले खेळी करत ७४ धावा केल्या, पण अखेरीस त्यांना पराभव पत्करावा लागला.
महत्वाच्या बातम्या –
आयएसएल: मोहन बागान विजयी ट्रॅकवर; प्ले-ऑफच्या रेसमध्ये कायम