ऑस्ट्रेलियात पुरूष क्रिकेट संघांचा आठवा टी20 विश्वचषक (T20 World Cup) खेळला जात आहे. ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून उपांत्य फेरीचे संघ निश्चित झाले आहेत. यातील पहिला उपांत्य फेरीचा सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 9 नोव्हेंबरला सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. दुसरा सामना 10 नोव्हेंबरला भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात ऍडलेड ओव्हलवर खेळला जाणार आहे.
टी20 विश्वचषक असो वा टी20 क्रिकेट मालिका भारतानेच इंग्लंडविरुद्ध बाजी मारली आहे. नुकतेच भारताने इंग्लंडमध्ये इंग्लंडचा टी20 मालिकेमध्ये 2-1असे पराभूत केले. या दोन संघाची टी20 आणि आयसीसी स्पर्धांमधील आकडेवारी काय ते आपण जाणून घेऊ.
भारत विरुद्ध इंग्लंड टी20 सामने
टी20 क्रिकेटची आकडेवारी पाहिली तर भारत-इंग्लंड आतापर्यंत 22 वेळा समोरासमोर आले आहेत. यामध्ये भारताचे पारडे जड ठरले कारण 12 सामने संघाने जिंकले, तर इंग्लंड 10 सामन्यात विजयी ठरला. त्याच्याशिवाय टी20 विश्वचषकातही भारताने इंग्लंडला दोन वेळा पराभूत केले आहे. तर इंग्लंडचा संघ एकवेळा भारताला पराभूत करण्यात यशस्वी ठरला.
भारत विरुद्ध इंग्लंड टी20 विश्वचषक
टी20 विश्वचषकाचा पहिला हंगाम 2007मध्ये खेळला गेला. त्यामध्ये भारताने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केला होता. त्याचा बदला म्हणून इंग्लंडने पुढच्याच हंगामात भारताला 3 धावांनी पराभूत केले होते. तर 2012मध्ये भारताने सामना 90 धावांनी जिंकत टी20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 2-1 अशी आघाडी घेतली.
आयसीसी विश्वचषक स्पर्धा
आयसीसी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीची गोष्ट केली तर भारत-इंग्लंड दोन वेळा भिडले आहेत. त्यातील पहिला सामना 1983च्या विश्वचषकाचा आहे. हा उपांत्य सामना भारताने कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. त्यानंतर 1987च्या विश्वचषकात भारताला घरच्या मैदानावर इंग्लंडकडून पराभूत व्हावे लागले होते.
1983चा वनडे वर्ल्डकप
1983चा सामना मॅनचेस्टरच्या मैदानावर खेळवला गेला. भारताने तेव्हा इंग्लंडचा डाव 213 धावांवरच गुंडाळला होता. त्या सामन्यात कपिल देव यांनी 35 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. तर मोहिंदर अमरनाथ आणि रॉजर बिन्नी (Roger Binny) यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या होत्या. अमरनाथ यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना 46 धावा केल्या होत्या. यशपाल शर्मा 61 आणि संदीप पाटिल नाबाद 51 धावा केल्या. हा सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला आणि अमरनाथ हे सामनावीर ठरले.
1987चा चा वनडे वर्ल्डकप
1987ला झालेला विश्वचषकाचा उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारतावर 35 धावांनी विजय मिळवला होता. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ग्रॅहम गूच सामनावीर ठरले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्स गमावत 254 धावा केल्या. तर भारताचा संघ 219 धावांवरच गारद झाला. मोहम्मद अझरूद्दीन याने सर्वाधिक अशा 64 धावा केल्या. या स्पर्धेतही कपिल देवच भारताचे कर्णधार होते.
2013 चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारताने एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. बर्मिंघम येथे झालेला हा सामना इंग्लंडने अवघ्या 5 धावांनी गमावला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सेमीफायनलिस्ट कर्णधारांपैकी पाहा कोण आहे सर्वात फ्लॅाप? रोहित, विलियम्सन, बाबर की बटलर?
शिवनारायन चंद्रपॉलसह ‘या’ दोन महान खेळाडूंचा ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश, पाकिस्तानचा खेळाडूही सामील