ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील वनडे मालिकेचा दुसरा सामना रविवारी (२९ नोव्हेंबर) होणार आहे. हा सामना सिडनी क्रिकट ग्राऊंडवर होणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे. तर ऑस्ट्रेलिया या सामन्यात मालिका विजयाच्या हेतूने उतरणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
पहिला सामना शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाने जिंकून ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आता रविवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यादरम्यान स्थानिक हवामान खात्याने नोंदवलेल्या अंदाजानुसार सिडनीतील वातावरण ढगाळ राहाणार आहे. त्यामुळे रविवारी सिडनीत पावसाचीही शक्यता आहे. ही क्रिकेट चाहत्यांसाठी चाहत्यांसाठी निराशेची बातमी आहे.
पाऊस पडला तर भारताला होईल नुकसान –
पहिला सामना भारतीय संघ पराभूत झाला असल्याने त्यांना या मालिकेतील उर्वरित दोन्ही सामने महत्त्वाचे आहेत. या दोन्ही सामन्यातील एखादा सामना जरी भारत पराभूत झाला तर त्यांना मालिका गमवावी लागणार आहे. त्यातही जर दुसऱ्या वनडेत पावसाचा व्यत्यय आला आणि सामना रद्द झाला तर भारताला ही मालिका जिंकता येणार नाही. जास्तीत जास्त भारतीय संघ मालिका बरोबरीत सोडवू शकतो.
असे असेल हवामान –
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सिडनी येथे होणाऱ्या दुसर्या वनडे सामन्यादरम्यान तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. तर आर्द्रता देखील ३७ टक्के असेल. त्याचवेळी वारा ताशी ४० किमी वेगाने वाहिल.
कधी होणार सामना –
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथे होणारा दुसरा वनडे सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.१० ला सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“पाकिस्तान संघ कोणता क्लब संघ नाही” शोएब अख्तर न्यूझीलंडवर कडाडला
समालोचन करताना गिलख्रिस्टकडून भारतीय खेळाडूबाबात मोठी चूक, चाहत्यांच्या रोषानंतर मागितली माफी
“…तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात”, विराटने घेतला भारतीय खेळाडूंचा समाचार
ट्रेंडिंग लेख –
भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला
भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके
आयपीएलमध्ये धावांसाठी वणवण करणारे ३ ऑस्ट्रेलियन भारताविरुद्ध पहिल्या वनडेत ‘सुपरहिट’