---Advertisement---

युवराजनंतर आता अभिषेक शर्मा इंग्लंडचा नवा ‘नाइटमेयर’..! एकाच सामन्यात रचले इतके विक्रम

---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळली जाणारी टी20 मालिका संपली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने फक्त एक सामना गमावला आणि उर्वरित चारही सामने जिंकण्यात यश मिळवले. मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्याने एकाच सामन्यात एकाच झटक्यात अनेक मोठे विक्रम मोडले. पाचव्या सामन्यात अभिषेक शर्माने असे वादळ आणले की इंइंग्लंडचा एकही गोलंदाज त्यातून सुटू शकला नाही. या एकाच सामन्यात अभिषेक शर्माने कोणत्या विक्रम केल्या आहेत ते पाहूया.

अभिषेक आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये भारतासाठी सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज बनला

अभिषेक शर्मा आता टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज बनला आहे. त्याने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 135 धावांची खेळी खेळली. यापूर्वी हा विक्रम शुबमन गिलच्या नावावर होता. शुबमन गिलने 2023 मध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध 63 चेंडूत 126 धावांची नाबाद खेळी खेळली. अभिषेक शर्माने शुबमन गिलपेक्षा कमी चेंडू खेळले आणि जास्त धावा केल्या. अभिषेक शर्माने फक्त 54 चेंडूंचा सामना करत 135 धावा केल्या. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल नंतर, ऋतुराज गायकवाडचा नंबर लागतो. गायकवाडने 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 123 धावा केल्या होत्या.

अभिषेक शर्माने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये भारतासाठी दुसरे सर्वात जलद शतक ठोकले

आता जर आपण टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्ण सदस्य संघांमधील स्पर्धेबद्दल बोललो तर अभिषेक टी20 शतक झळकावणारा तिसरा सर्वात जलद फलंदाज ठरला आहे. 2017 मध्ये बांग्लादेशविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावले. यानंतर रोहित शर्माचे नाव येते. हिटमॅनने देखील तितक्याच चेंडूत 2017 मध्येच श्रीलंकेविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतकी खेळी केली. आता अभिषेक शर्माने फक्त 37 चेंडूत शतक झळकावून तिसरे स्थान पटकावले आहे. त्याने 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 39 चेंडूत शतक ठोकणाऱ्या जॉन्सल चार्ल्सचा विक्रम मोडला आहे. तो भारतासाठी अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

भारताकडून एका टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

अभिषेक शर्माने त्याच्या शतकी खेळीदरम्यान 13 षटकार मारले. आता तो टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. त्याने रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे. 2017 मध्ये जेव्हा रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध शतक केले तेव्हा त्याने त्याच्या डावात 10 षटकार मारले. आता अभिषेकने 13 षटकार मारले आहेत. त्याने रोहित शर्माला मागे टाकले आहेच पण त्याच्यावर चांगल्या फरकाने आघाडीही घेतली आहे.

हेही वाचा-

टी20 वर्ल्डकप जिंकताच भारतीय खेळाडूंवर पैशांचा वर्षाव, बीसीसीआयची मोठी घोषणा
Maharashtra Kesari Winners List: आजपर्यंतच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या विजेत्यांची यादी
जाणून घ्या कोण आहे गोंगाडी त्रिशा? जी ठरली अंडर19 महिला टी20 वर्ल्डकपची सर्वोत्तम खेळाडू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---