मुंबई। न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि न्यूझीलंड संघात सध्या कसोटी मालिका सुरू असून दुसरा आणि अखेरचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. कारण सध्या मालिकेत ०-० अशी बरोबरी आहे, त्यामुळे हा सामना जिंकेल, तो मालिका विजेता होणार आहे. पण, या सामन्यावर सध्या पावसाचे सावट आहे.
महाराष्ट्रात बरसतायेत सरी
सध्या महाराष्ट्रातील बऱ्याच राज्यात पाऊसाच्या सरी कोसळत आहे, यात पुणे, मुंबई सारख्या जिल्ह्यांचाही समावेश आहे. त्यामुळे शुक्रवारपासून (३ डिसेंबर) सुरु होणाऱ्या मुंबई कसोटीवर देखील पावसाचे सावट आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाची वर्तवण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी पाऊसाची शक्यता असल्याने खेळाच्या पहिल्या सत्रावर परिणाम होऊ शकतो. किंवा सामना उशिरा सुरू होऊ शकतो. तसेच या दिवशी वातावरणही ढगाळ असण्याची शक्यता आहे. शुक्रवारी मुंबईचे तापमान २९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तसेच पावसाच्या शक्यतेसोबतच ताशी ११ किमी वेगाने वारेही वाहतील. पण, त्यानंतर उर्वरित ४ दिवसांमध्ये हवामान सुधारण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर दोन्ही संघांना पावसाच्या व्यत्ययामुळे इनडोअर सराव करावा लागला आहे.
विराट कोहलीचे पुनरागमन
भारताचा कर्णधार विराट कोहली या सामन्यातून संघात पुनरागमन करणार आहे. त्याला याआधी पहिल्या कसोटीसाठी आणि त्यापूर्वी झालेल्या टी२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. पण, आता तो संघात परतला असून नेतृत्त्वाची जबाबदारी पुन्हा हाती घेईल.
हा सामना पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने केवळ २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली आहे. वानखेडे स्टेडियममध्ये एका वेळी ३३ हजार प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात. परंतु, नवीन नियमावलीनुसार फक्त ८ हजार प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेऊ शकतील. या सामन्यासाठीची तिकीट विक्री मंगळवारी (३० नोव्हेंबर) संध्याकाळी ४ वाजता सुरू झाली होती. तसेच काही मिनिटातच हे तिकीट सर्व विकले गेले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कडक!! नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर फलंदाज क्लीन बोल्ड; ४ ते ५ फूट लांब उडला स्टंप
“ओ पाजी मै गिर गया”, मुंबई कसोटीसाठी ‘प्लेइंग ११’ निवडण्यावरून वसीम जाफरने शेअर केले मजेशीर मीम